शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: September 27, 2016 00:31 IST

गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली.

ब्रह्मानंद करंजेकर यांची मागणी भंडारा : गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. आताच्या या पावसाने जड धानाला फायदा होणार असला तरी हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे.सिंचनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आॅगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला. आता आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे किडीचा प्रकोप वाढला आहे. धानपिकांवर लष्करी अळी, तुळतुळा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने किटकनाशके व औषधी विनामुल्य देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांवर विजेचे संकट ओढवले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतीला पाणी केव्हा द्यायचे, खायचे केव्हा आणि झोपायचे केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर देण्याची मागणीही जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)