शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: September 27, 2016 00:31 IST

गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली.

ब्रह्मानंद करंजेकर यांची मागणी भंडारा : गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. आताच्या या पावसाने जड धानाला फायदा होणार असला तरी हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे.सिंचनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आॅगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला. आता आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे किडीचा प्रकोप वाढला आहे. धानपिकांवर लष्करी अळी, तुळतुळा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने किटकनाशके व औषधी विनामुल्य देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांवर विजेचे संकट ओढवले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतीला पाणी केव्हा द्यायचे, खायचे केव्हा आणि झोपायचे केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर देण्याची मागणीही जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)