शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

लोहार, गारुडी समाज विकासापासून दूर

By admin | Updated: October 4, 2015 01:24 IST

स्वातंत्र्याच्या साठीनंतरही लोहार, पारधी, बेलदार, गारूडी समाजाच्या नशिबी भटकंतीच आली आहे.

शासनाची उदासीनता : संसार डोक्यावर घेऊन या गावातून त्या गावात भटकंती लाखांदूर : स्वातंत्र्याच्या साठीनंतरही लोहार, पारधी, बेलदार, गारूडी समाजाच्या नशिबी भटकंतीच आली आहे. हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. भटके जीवन त्यांच्या वाट्याला आले असून त्यांच्या विकासासाठी शासनाचे धोरणच उदासीन आहे. भटके जीवन जगणारा समाज घरादाराविना आपला संसार डोक्यावर घेऊन या गावातून त्या गावात भटकंती करीत आयुष्याचे ओझे वाहत आहे. शासन, प्रशासनाच्या नजरेतही चोर, अपराधी अशीच त्यांची ओळख आहे. जनगणनेमध्ये या समाजातील नागरिकांचा समावेश आहे किंवा नाही हे सुद्धा माहिती नाही. लोहार, पारधी, गारूडी, बेलदार या भटके जीवन जगणाऱ्या समाजाला अजूनही अन्य लोकांसारखे सुखी आयुष्य जगता आले नाही. त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्येही अभाव आढळून येत आहे. सर्वस्व गमावलेल्या या समाजाला कोणताच सन्मान नाही. असे असतानाही शासनाकडून या समाजाच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. या समाजातील नागरिक मोठ्या गावात किंवा शहरात गेल्यास सर्वप्रथम या समाजातील कुटुंबप्रमुखांना पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागते. त्यांच्या राहत्या वेळात कोणतीही घटना घडल्यास सर्वप्रथम त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविले जाते. विशेष म्हणजे या भटकंती करणाऱ्या समाजाचे नाव शासकीय कार्यालयात नाही. एखाद्या सरकारी कामासाठी अत्यंत आवश्यकतेचे कागदपत्र त्यांना लागत असल्यास त्यांना कुठेच मिळत नाही. जीवाचे रान करीत खाण्यापुरते पैसे जमा करणारा हा समाज स्वातंत्र्याच्या साठीनंतरही अगतिकतेचे जिणे जगत आहे. शासनाने या संदर्भात ठोस पाऊल उचलून या समाजाचा विकास घडवून आणावा असेच आता बोलले जात आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)