शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

लोहार, गारुडी समाज विकासापासून दूर

By admin | Updated: October 4, 2015 01:24 IST

स्वातंत्र्याच्या साठीनंतरही लोहार, पारधी, बेलदार, गारूडी समाजाच्या नशिबी भटकंतीच आली आहे.

शासनाची उदासीनता : संसार डोक्यावर घेऊन या गावातून त्या गावात भटकंती लाखांदूर : स्वातंत्र्याच्या साठीनंतरही लोहार, पारधी, बेलदार, गारूडी समाजाच्या नशिबी भटकंतीच आली आहे. हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. भटके जीवन त्यांच्या वाट्याला आले असून त्यांच्या विकासासाठी शासनाचे धोरणच उदासीन आहे. भटके जीवन जगणारा समाज घरादाराविना आपला संसार डोक्यावर घेऊन या गावातून त्या गावात भटकंती करीत आयुष्याचे ओझे वाहत आहे. शासन, प्रशासनाच्या नजरेतही चोर, अपराधी अशीच त्यांची ओळख आहे. जनगणनेमध्ये या समाजातील नागरिकांचा समावेश आहे किंवा नाही हे सुद्धा माहिती नाही. लोहार, पारधी, गारूडी, बेलदार या भटके जीवन जगणाऱ्या समाजाला अजूनही अन्य लोकांसारखे सुखी आयुष्य जगता आले नाही. त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्येही अभाव आढळून येत आहे. सर्वस्व गमावलेल्या या समाजाला कोणताच सन्मान नाही. असे असतानाही शासनाकडून या समाजाच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. या समाजातील नागरिक मोठ्या गावात किंवा शहरात गेल्यास सर्वप्रथम या समाजातील कुटुंबप्रमुखांना पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागते. त्यांच्या राहत्या वेळात कोणतीही घटना घडल्यास सर्वप्रथम त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविले जाते. विशेष म्हणजे या भटकंती करणाऱ्या समाजाचे नाव शासकीय कार्यालयात नाही. एखाद्या सरकारी कामासाठी अत्यंत आवश्यकतेचे कागदपत्र त्यांना लागत असल्यास त्यांना कुठेच मिळत नाही. जीवाचे रान करीत खाण्यापुरते पैसे जमा करणारा हा समाज स्वातंत्र्याच्या साठीनंतरही अगतिकतेचे जिणे जगत आहे. शासनाने या संदर्भात ठोस पाऊल उचलून या समाजाचा विकास घडवून आणावा असेच आता बोलले जात आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)