शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र-राज्यातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:49 IST

केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे.

ठळक मुद्देसुरेश माने : साकोलीत विदर्भस्तरीय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महापरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे. सकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणे, नियोजन, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, चुकीचे नोटबंदी धोरण व शेती, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी यांना शुन्य प्राधान्य यामुळेच देशातील शेती, शेतकरी यांच्यावर अवलंबून ८५ टक्के जनता देशोधडीला लागली आहे, अशी घणाघाती टीका बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व घटनातज्ज्ञ अ‍ॅड़ डॉ. सुरेश माने यांनी साकोली येथे मंगळवारी पक्षाच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महापरिषदेत केली.शेतकरी, शेतमजूर रोजगारी विरोधी धोरणांचा आकडेवार समाचार घेतांना अ‍ॅड.डॉ. माने म्हणाले, भारतात सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य, शेतकरी आत्महत्येत प्रथम क्रमांकाचे राज्य, विषारी किटकनाशके शेतीसाठी वापरणारे एक नंबरचे राज्य व त्यामुळे मरणारे शेतकरी यांच्यात सुध्दा पहिल्या क्रमांकाचे राज्य हे छत्रपतींचा वारसा सांगणाºया महाराष्ट्रातील फडणवीस, सेना-भाजपा सरकारला शर्मनाक नव्हे काय असे महाराष्ट्रातील नालायक सरकार यापुढे राज्यात येणार नाही याची खबरदारी राज्यातील जनतेने घेतलीच पाहिजे अशा इशाराही त्यांनी दिला.शेती-शेतमजूर यांची फसवणूक केंद्र-राज्य सरकारे करीत आहेत. त्यासाठी जाहिरातबाजीवर करोडो रुपये उधळले जात आहेत. सरकारी बॅकांचे लाखो करोडो शेती-शेतमजूर यांची फसवणूक केंद्र-राज्य सरकारे करीत आहेत. शेतमालाचा भाव ठरविणे व गरीब शेतकºयांना मासिक रु. ५००० पेन्शन योजना सुरु करणे यासाठी केंद्र व राज्याने कायदा करण्याची गरज आहे. तसेच शेती मालाचा भाव ठरविताना शेतकºयांचे रास्त म्हणणे सरकारने स्वीकारले पाहिजे व तसे सरकारने न ऐकल्यास राज्य घटनेच्या कलम ३२३ (ब) द्वारे शेतकरी लवादाची निर्मीती करुन शेतीमाल दर शेतकºयांना मान्य नसल्यास लवादापुढे प्रकरण मांडून शेतकºयांना न्याय देणारी कायदेशीर व्यवस्था निर्माण केली पाहिजे. जमिनीचे फेरवाटप केले पाहिजे असे अनेक उपाय योजना अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी मांडले.अशाच परिषद राज्यभर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड.डॉ. सुरेश माने लिखीत ‘शेती, शेतमजूरांचे मरण हेच सरकारांचे धोरण’ ही पुस्तिका, बीआरएसपीचे विदर्भ राज्य संयोजक दशरथ मडावी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. महापरिषदेला राजू झोडे, डॉ.गणवीर, प्रा. जावेद पाशा, छायाताई कुरुळकर, विशेष फुटाने, संजय गाढवे, प्रा. वामन शेडमाके व इतर वक्त्यांनी समयोचित भाषणे केली. महापरिषदेचे स्वागत पर भाषण पक्षाचे जेष्ठ नेते दुधकवर गुरुजी यांनी तर प्रास्ताविक श्रावण भानारकर यांनी केले. संचालन पक्षाचे भंडारा जिल्हा प्रभारी राजेश बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन मनोज बन्सोड यांनी केले. या परिषदेत विदर्भातील ग्रामपंचायत सरपंच निवडणूका बीआरएसपी विजयी उमेदवारांचा शाल व पुष्पगुच्छ देवून पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर पक्षाच्या वतीने आर्थिक सहाय्य पक्षाला अर्पण करुन पक्षाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांचा सत्कार करण्यात आला.