शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:28 IST

धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कोका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोका येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी मंचावर राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, रामलाल चौधरी, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, देवचंद ठाकरे, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, रूपेश खवास, सोनू खोब्रागडे, हरी खोब्रागडे, क्रिष्णा नरडंगे, उत्तम गडपाले, नितु सेलोकर, पंचायत समिती सदस्य, सुजाता फेंडर, नितीन तुमाने, अनिता तितिरमारे, काशिनाथ हातझाडे, उषा चौधरी, कोकाचे सरपंच संजय इळपाते, रविंद्र तिडके उपस्थित होते.खासदार प्रफुल पटेल म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाचे राष्ट्रीय दर्जा काढल्याने प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मिळणारा निधी अल्प आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजना व करचखेडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला कमी निधी मिळाल्यामुळे पुनर्वसनाचे काम मोठया प्रमाणात रखडलेले आहे. केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकार सर्वसामान्यांसाठी हिताचे नसून उद्योगपतींचे सरकार आहे.शेतकºयांच्या अडीअडचणी ऐकून ते सोडवण्याचे आश्वासन दिले. येत्या निवडणुकीत आघाडीची सरकार आली तर धानाला अडीच हजार रूपये दर देण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करून केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. यावेळी मंचावर उपस्थित अतिथींनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.मेळाव्यात खमारी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य उत्तम कळपाते यांनी क्षेत्रातील अडचणी व समस्या प्रफुल पटेल, मधुकर कुकडे यांच्यासमोर सादर केले. प्रास्ताविक हितेश सेलोकर यांनी केले. संचालन प्रदीप रंगारी यांनी तर, आभार प्रदर्शन वाल्मिक गोबाडे यांनी केले.यावेळी ज्योत्सना मेश्राम, सरिता कोडवते, जयश्री हातझाडे, नरविर टेकाम, कमलेश मेश्राम, तुकाराम हातझाडे, सुभाष तितिरमारे, रामेश्वर राघोर्ते, शामराव उईके, प्रभू फेंडर, किशोर ठवकर, हेमलता टेकाम, अनुसया उईके, रविंद्र रामटेके, वशिष्ठ गाढवे, वासूदेव तितिरमारे, राजु लुटे, सेवक बोरकर, वसंत रेहपाडे, दिवाकर उईके, राहुल तितिरमारे, भूषण गाढवे, रवि तिडके, अतुल तिडके, श्रीराम नेवारे, गोपीचंद कुंभरे, रामचंद्र हातझाडे, सुकराम कळनायके यांच्यासह शेतकºयांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.