शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:28 IST

धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कोका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोका येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी मंचावर राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, रामलाल चौधरी, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, देवचंद ठाकरे, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, रूपेश खवास, सोनू खोब्रागडे, हरी खोब्रागडे, क्रिष्णा नरडंगे, उत्तम गडपाले, नितु सेलोकर, पंचायत समिती सदस्य, सुजाता फेंडर, नितीन तुमाने, अनिता तितिरमारे, काशिनाथ हातझाडे, उषा चौधरी, कोकाचे सरपंच संजय इळपाते, रविंद्र तिडके उपस्थित होते.खासदार प्रफुल पटेल म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाचे राष्ट्रीय दर्जा काढल्याने प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मिळणारा निधी अल्प आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजना व करचखेडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला कमी निधी मिळाल्यामुळे पुनर्वसनाचे काम मोठया प्रमाणात रखडलेले आहे. केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकार सर्वसामान्यांसाठी हिताचे नसून उद्योगपतींचे सरकार आहे.शेतकºयांच्या अडीअडचणी ऐकून ते सोडवण्याचे आश्वासन दिले. येत्या निवडणुकीत आघाडीची सरकार आली तर धानाला अडीच हजार रूपये दर देण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करून केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. यावेळी मंचावर उपस्थित अतिथींनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.मेळाव्यात खमारी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य उत्तम कळपाते यांनी क्षेत्रातील अडचणी व समस्या प्रफुल पटेल, मधुकर कुकडे यांच्यासमोर सादर केले. प्रास्ताविक हितेश सेलोकर यांनी केले. संचालन प्रदीप रंगारी यांनी तर, आभार प्रदर्शन वाल्मिक गोबाडे यांनी केले.यावेळी ज्योत्सना मेश्राम, सरिता कोडवते, जयश्री हातझाडे, नरविर टेकाम, कमलेश मेश्राम, तुकाराम हातझाडे, सुभाष तितिरमारे, रामेश्वर राघोर्ते, शामराव उईके, प्रभू फेंडर, किशोर ठवकर, हेमलता टेकाम, अनुसया उईके, रविंद्र रामटेके, वशिष्ठ गाढवे, वासूदेव तितिरमारे, राजु लुटे, सेवक बोरकर, वसंत रेहपाडे, दिवाकर उईके, राहुल तितिरमारे, भूषण गाढवे, रवि तिडके, अतुल तिडके, श्रीराम नेवारे, गोपीचंद कुंभरे, रामचंद्र हातझाडे, सुकराम कळनायके यांच्यासह शेतकºयांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.