शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गरिबांची साखर झाली कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:18 IST

सामान्य व गरीब, मजुर यांच्या लाभासाठी शासनाकडून रास्तभाव दुकानातून कमी किंमतीत गहु, तांदुळ, साखर, रॉकेल अश्या जिवनावश्यक वसतु अनेक वर्षांपासून दिल्या जात होत्या.

साखर व रॉकेलचा कोटा कमी : ‘अच्छे दिन’ची सुरुवात?सिराज शेख । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सामान्य व गरीब, मजुर यांच्या लाभासाठी शासनाकडून रास्तभाव दुकानातून कमी किंमतीत गहु, तांदुळ, साखर, रॉकेल अश्या जिवनावश्यक वसतु अनेक वर्षांपासून दिल्या जात होत्या. त्या आता हळुहळु थोड्या थोड्या प्रमाणात कमी केल्या जात असुन सध्या साखर व रॉकेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ सुध्दा करण्यात आली आहे. यामुळे आता गरीब कष्टकरी जनतेच्या ताटातून गोड धोड वस्तुंचे पकवान बाद होणार आहेत. यामुळेच हेच का अच्छे दिन असा सवाल उपस्थित होत आहे.दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना शासनाच्या रास्तभाव धान्यदुकानातुन अन्न धान्याचा पुरवठा कमी किंमतीत केला जातो. पुर्वी दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या व्यक्ती ऐवजी सामानय गरीब व मजुर वर्गाना सुध्दा अल्प किंमतीत धान्य दिले जात होते ते आता साफ बंद करण्यात आले आहे. आता फक्त बीपीएल धारकांनाच धान्य दिले जाते. पुर्वी या लोकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे साखर दिली जात होती. त्यामुळे पाच व्यक्तींच्या कुटुंबाला अडीच किलो साखर मिळत होती. या साखरेचे ते दररोज चहा बनविण्यासाठी व सणासुदीमध्ये गोडधोड पकवानासाठी उपयोग करायचे. मात्र आता शासनाने साखरेच्या कोट्यात कपात केली असून प्रति कार्डधारकास फक्त एक किलो साखर देण्यात येत आहे. एवढेच नाही तर साखरेच्या भावात सरळ ६.५० रुपयांनी वाढ सुध्दा करण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांना ‘खाएंगा क्या, और खिलायेंगा क्या’ अशी परिस्थिती झाली आहे. पुर्वी साखरेचे भाव १३.५० रु. किलो होते ते आता २० रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक राशनकार्ड धारकांना मिळणारा रॉकेल सुध्दा शासनाने बंद करुन ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अश्याच लोकांना रॉकेल दिला जात आहे. पुर्वी प्रतिव्यक्त्ी एक लिटरप्रमाणे मिळणारा रॉकेलही आता कमी करण्यात आला असून जास्तीत जास्त चार लिटरपेक्षा जास्त रॉकेल देण्यात येत नाही. १२ रुपये मिळणारा रॉकेल आता २२ रुपये लिटरप्रमाणे देण्यात येत आहे.सामान्य गरीब व्यक्तींना आवश्यक असलेल्या साखर व रॉकेल आता शासन बंद करण्याच्या तयारीत असल्याचे जानवते या दोन्ही वसतुंच्या वाटपाच्या तयारीत असल्याचे जानवते या दोन्ही वस्तुंच्या वाटपात कात्री लावण्यात आल्याने सामान्य गरीबांना आता खुल्या बाजारातून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी भुर्दंड सोसावा लागणार आहे गॅस सिलेंडरचे भावही भरमसाठ वाढलेले आहे.साखर व रॉकेलच्या किंमतीत वाढस्वस्त भाव राशन दुकानात मिळणारी १३ रुपये किंमतीची साखर आता २० रुपये प्रति किलो झाली असून प्रतिकार्उ फक्त एकच किलो दिली जात आहे. तर रॉकेलच्या किंमतीत ही भरमसाठ वाढ करुन रॉकेल आता २२ रुपये लिटर प्रमाणे दिला जात आहे. अनेकांचा रॉकेल बंद करण्यात आल्याने विद्युत गेल्यावर दिवाबत्ती कशी लावावी, चुल कसे पेटवावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. इकडे खुल्या बाजारात साखर ४४ रुपये प्रति किलो आहे तर सिलेंडरचा भाव ६५० रुपये झाला आहे.