शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गरिबांची साखर झाली कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:18 IST

सामान्य व गरीब, मजुर यांच्या लाभासाठी शासनाकडून रास्तभाव दुकानातून कमी किंमतीत गहु, तांदुळ, साखर, रॉकेल अश्या जिवनावश्यक वसतु अनेक वर्षांपासून दिल्या जात होत्या.

साखर व रॉकेलचा कोटा कमी : ‘अच्छे दिन’ची सुरुवात?सिराज शेख । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सामान्य व गरीब, मजुर यांच्या लाभासाठी शासनाकडून रास्तभाव दुकानातून कमी किंमतीत गहु, तांदुळ, साखर, रॉकेल अश्या जिवनावश्यक वसतु अनेक वर्षांपासून दिल्या जात होत्या. त्या आता हळुहळु थोड्या थोड्या प्रमाणात कमी केल्या जात असुन सध्या साखर व रॉकेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ सुध्दा करण्यात आली आहे. यामुळे आता गरीब कष्टकरी जनतेच्या ताटातून गोड धोड वस्तुंचे पकवान बाद होणार आहेत. यामुळेच हेच का अच्छे दिन असा सवाल उपस्थित होत आहे.दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना शासनाच्या रास्तभाव धान्यदुकानातुन अन्न धान्याचा पुरवठा कमी किंमतीत केला जातो. पुर्वी दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या व्यक्ती ऐवजी सामानय गरीब व मजुर वर्गाना सुध्दा अल्प किंमतीत धान्य दिले जात होते ते आता साफ बंद करण्यात आले आहे. आता फक्त बीपीएल धारकांनाच धान्य दिले जाते. पुर्वी या लोकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे साखर दिली जात होती. त्यामुळे पाच व्यक्तींच्या कुटुंबाला अडीच किलो साखर मिळत होती. या साखरेचे ते दररोज चहा बनविण्यासाठी व सणासुदीमध्ये गोडधोड पकवानासाठी उपयोग करायचे. मात्र आता शासनाने साखरेच्या कोट्यात कपात केली असून प्रति कार्डधारकास फक्त एक किलो साखर देण्यात येत आहे. एवढेच नाही तर साखरेच्या भावात सरळ ६.५० रुपयांनी वाढ सुध्दा करण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांना ‘खाएंगा क्या, और खिलायेंगा क्या’ अशी परिस्थिती झाली आहे. पुर्वी साखरेचे भाव १३.५० रु. किलो होते ते आता २० रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक राशनकार्ड धारकांना मिळणारा रॉकेल सुध्दा शासनाने बंद करुन ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अश्याच लोकांना रॉकेल दिला जात आहे. पुर्वी प्रतिव्यक्त्ी एक लिटरप्रमाणे मिळणारा रॉकेलही आता कमी करण्यात आला असून जास्तीत जास्त चार लिटरपेक्षा जास्त रॉकेल देण्यात येत नाही. १२ रुपये मिळणारा रॉकेल आता २२ रुपये लिटरप्रमाणे देण्यात येत आहे.सामान्य गरीब व्यक्तींना आवश्यक असलेल्या साखर व रॉकेल आता शासन बंद करण्याच्या तयारीत असल्याचे जानवते या दोन्ही वसतुंच्या वाटपाच्या तयारीत असल्याचे जानवते या दोन्ही वस्तुंच्या वाटपात कात्री लावण्यात आल्याने सामान्य गरीबांना आता खुल्या बाजारातून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी भुर्दंड सोसावा लागणार आहे गॅस सिलेंडरचे भावही भरमसाठ वाढलेले आहे.साखर व रॉकेलच्या किंमतीत वाढस्वस्त भाव राशन दुकानात मिळणारी १३ रुपये किंमतीची साखर आता २० रुपये प्रति किलो झाली असून प्रतिकार्उ फक्त एकच किलो दिली जात आहे. तर रॉकेलच्या किंमतीत ही भरमसाठ वाढ करुन रॉकेल आता २२ रुपये लिटर प्रमाणे दिला जात आहे. अनेकांचा रॉकेल बंद करण्यात आल्याने विद्युत गेल्यावर दिवाबत्ती कशी लावावी, चुल कसे पेटवावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. इकडे खुल्या बाजारात साखर ४४ रुपये प्रति किलो आहे तर सिलेंडरचा भाव ६५० रुपये झाला आहे.