शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारीने फुटणार तांदूळ तस्करीचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार परप्रांतातून धान आणि तांदुळाची निर्यात महाराष्ट्रात करता येत नाही. निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी बिलासह त्याची पूर्तता करावी लागते. परंतु परप्रांतातून तांदूळ खरेदीसाठी शासन परवानगी देत नाही. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धान पिकतो. खरीप व रबी या हंगामात धान खरेदी करतेवेळी शासनाच्या नाकी नऊ येते. धान ठेवायला गोदामही नसतात.

ठळक मुद्देकोट्यवधीचा व्यवहार : सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागणार

संजय साठवणेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : परप्रांतातून स्वस्त तांदूळ विकत आणून तो शासनाला अधिक किमतीत विकण्याच्या काही राईसमिल चालकांचा गोरखधंद्याचा पर्दाफाश साकोली तालुक्यात झालेल्या २२ लाख ५० हजार रुपयांच्या वाटमारीने होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तस्करीच्या दृष्टिकोनातूनही तपास करण्याची गरज आहे. मात्र राजकीय दबावतंत्राचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्नही सुरू झाल्याची माहिती आहे. साकोली तालुक्यातील पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर दोन दिवसांपूर्वी वाटमारी झाली होती. तेलंगणातील रमेश अन्ना याचा दिवानजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर हा तांदूळाच्या रकमेच्या   वसुलीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास भिरकड याचे रमेश अन्नाकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकले होते. त्यामुळेच त्याने लुटमारीचा कट रचला आणि २२ लाख ५० हजार रुपये लुटलेही परंतु भंडारा पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने तो जेरबंद झाला. एखाद्या ट्रक मालकाचे धान व्यापाऱ्याकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकीत होत असेल तर किती मोठ्या प्रमाणात पूर्व विदर्भात तेलंगणातून तांदूळ आला असेल याची कल्पनाही करवत नाही. विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार परप्रांतातून धान आणि तांदुळाची निर्यात महाराष्ट्रात करता येत नाही. निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी बिलासह त्याची पूर्तता करावी लागते. परंतु परप्रांतातून तांदूळ खरेदीसाठी शासन परवानगी देत नाही. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धान पिकतो. खरीप व रबी या हंगामात धान खरेदी करतेवेळी शासनाच्या नाकी नऊ येते. धान ठेवायला गोदामही नसतात. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असतात. अशास्थितीत परप्रांतातून तांदूळ येतो म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी काळेबेरे असण्याचा संशय आहे. या वाटमारीच्या प्रकरणाचा तांदूळ तस्करीशी संबंध जोडून तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. लुटमार प्रकरणाने भंडारा जिल्ह्यातील तांदूळ तस्करीचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. आता गरज आहे ती वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशीची.

अशी होते तांदळाची अदलाबदल

आधारभूत खरेदी केंद्रावर शासन धानाची खरेदी करते. हा धान मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. त्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. एक क्विंटल धानापासून ६७ क्विंटल धानाचा उतारा येणे अपेक्षित असते. हा तांदूळ नंतर स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविला जातो. मात्र अधिक पैसे कमावण्याच्या नादात व्यापारी परराज्यातून तांदूळ १८ रुपये किलो दराने खरेदी करतात. नंतर हाच तांदूळ शासनाला २४ रुपये किलो दराप्रमाणे विकतात. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार शासकीय धान खरेदी केंद्रातील धान पुन्हा व्यापाऱ्यांनाच विकतात, असा हा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू आहे. कोट्यवधीच्या घरात उलाढाल असते. 

निकृष्ट धान खरेदीची सुरू आहे चौकशी - भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निकृष्ट धान खरेदी प्रकरण विधानसभेत गाजले होते. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच बरोबर आता परप्रांतीय तांदळाची चौकशी केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. 

सखोल चौकशीची गरज - तांदूळ खरेदी प्रकरणात कोट्यवधी उलाढाल केली जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होण्याची गरज आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये उकळणारे पुढे येतीलच परंतु आतापर्यंत आयकर, विक्रीकर आणि जीएसटीचे बुडविलेले पैसेही पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु राजकीय वरदहस्तात प्रकरण दडपले जाण्याची शक्यता आहे. काही राईस मील चालक यात सहभागी असल्याने कारवाई होईल की नाही यांची शंका आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी