पुरुषोत्तम डोमळे सानगडीसामाजिक, ऐतिहासिक, राष्ट्रीय, साहित्यीक, वनवैभव, नदीनाले, प्रकल्प या सगळ्याच दृष्टीने सानगडी गाव नटला आहे. या गावाला भोसलेकालीन युद्धाची पार्श्वभूमी आहे. परंतु सानगडीचे वैभव नाहिसे होत आहे. ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित होऊन ओस पडू लागली आहेत. सानगडी गाव आधीचे सहानगड, आजच्या घडंीला सानगडीत दोन प्राचीन बाहुली विहिर आहेत. या विहिरीचे बांधकाम फक्त दगडानी केले आहेत. विहिरीत उतरण्यासाठी जवळपास ५० ते ६० पायऱ्या असून आतील भागात मोठमोठ्या खोल्या राहण्यासाठी काढलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये भोसलेकालीन लोकयुद्धाचे वेळेस सुरक्षिततेच्या दृष्टीने मुक्कामाने राहत होते. नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी इ.स. १७३४ मध्ये सानगडीत २ हेक्टर ४३ आर जागेत उंच टेकडीवर किल्ला बांधला. उत्तर दक्षिण अंदाजे ६० मीटर लांब व पूर्व पश्चिम ४० मीटर रुंद आहे. त्यापूर्वी इ.स. १७०० मध्ये बख्त बुलंदशहा यांचे छिंदवाडा जिल्ह्यात राजधानी असताना भंडारा विभागात सानगडी ने प्रतापगड आणि तिरोडा ते आंबागडपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्याला जोडून घेतला. यावेळी अस्तित्वात असलेल्या या बाहुली विहिरी भोसलेकालीन युद्ध काळात गुप्ते खलबते करण्याकरिता उपयोग करीत असावे, अशी माहिती आहे. खोल्यांच्या आत मध्ये गेल्यावर खोल गर्तेत थंड पाणी असते. ते आटत नाही. दोन विहिरीपैकी एक विहीर पूर्णपणे बुजलेली आहे. या विहिरीचे पाणी व गाळ उपसल्यास प्राचीन नाणी, भांडे, शस्त्र, हिरे, भेटू शकतात. त्यामुळे नव्या इतिहासाचा जन्म होऊ शकतो. परंतु याबद्दल कुणालाही उत्सुकता नाही. मात्र कालौघात हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी गुप्त खलबते करण्याकरिता बाहुली विहिरीचा उपयोग होत असे. मात्र आता कुत्रे, मांजर, जनावरे यात प्रवेश महिला-पुरुष मंडळी अजिबात आत प्रवेश करीत नाही. सानगडीतील जनतेला या वास्तूची देणे घेणे नाही. ऐतिहासिक स्थळे पुढच्या पिढीला नजरेआड होणार हे मात्र निश्चित.
भोसलेकालीन सुरक्षित स्थळे ओस पडू लागली
By admin | Updated: June 1, 2015 01:12 IST