शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

भारनियमनाचा फटका धानपिकाला

By admin | Updated: October 3, 2014 01:09 IST

भारनियमनामुळे सहा गावातील संपूर्ण धान पीक धोक्यात आले आहे. दोन दिवस धानाला पाणी मिळाले नाही तर पीके नष्ट होतील.

तुमसर : भारनियमनामुळे सहा गावातील संपूर्ण धान पीक धोक्यात आले आहे. दोन दिवस धानाला पाणी मिळाले नाही तर पीके नष्ट होतील. याविरोधात शेकडो शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्याला तुमसर येथील कार्यालयात घेराव करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सायंकाळपर्यंत आंदोलनकर्ते कार्यालयात बसून होते. उमरवाडा, नवरगाव, बोरी, कोष्टी, डोंगरला, बाम्हणी येथे १६ तास भारनियमन सुरु आहे. केवळ आठ तास वीज पुरवठा सुरु राहतो. त्यातही तांत्रिक बिघाड सुरुच आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास उपकार्यकारी अभियंत्यांना शेकडो शेतकऱ्यांनी घेराव केला. निदर्शने व नारेबाजी केली. उपकार्यकारी अभियंता गडपायले यांनी कार्यकारी अभियंता अमीत परांजपे व अधीक्षक अभियंता सतीश मेश्राम यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून घेरावा संदर्भात माहिती दिली. परंतु त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी शिवाय काहीच करता येत नाही असे उपकार्यकारी अभियंता गडपायले यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू होते. कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली. खासदारांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी काय ते बघतो असे सांगितल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील विद्युत फिडरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेत असताना भारनियमन का करण्यात येते याकडे बळीराजा वारंवार प्रश्न विचारत असला तरी लोकप्रतिनिधींसह सामान्य प्रशासनही लक्ष देत नाही. (तालुका प्रतिनिधी)