शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण बिघडविणार पंचायत समित्यांचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 16:09 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे

ठळक मुद्देसत्ता स्थापनेचा संभ्रम भाजपच्या नाराज गटाकडे सर्वांच्या नजरा

भंडारा :जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण पंचायत समित्यांचे मात्र गणित बिघडविण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडून सत्ता स्थापन केली, तर पंचायत समितीत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला १३, भाजप १२, शिवसेना व बसपा प्रत्येकी एक आणि चार अपक्ष निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी होणार, अशी चर्चा रंगत होती. नैसर्गिक मित्र असलेले दोन मित्र एकत्र येत असल्याने याबद्दल कुणालाही अडचण नव्हती. मात्र, गत आठ दिवसांपासून भाजपातील एक नाराज गट सक्रिय झाला आहे. हा गट असून, त्यांच्याकडे सहा सदस्य असल्याचा दावा आहे.

मोहाडी नगरपंचायतीत भाजपाने आपल्या गटासोबत दगाफटका केला तर आपण सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे माजी आमदार चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे २१ आणि भाजपच्या नाराज गटातील सहा सदस्य एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते. सात पंचायत समित्यांपैकी भाजपने भंडारा, मोहाडी आणि तुमसरमध्ये वर्चस्व सिद्ध केले, तर लाखनी, साकोली आणि पवनीत काँग्रेस वरचढ ठरली. लाखांदूरमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीची सावध भूमिका

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याच्या हालचालींनी वेग घेतला असला तरी राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. १३ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेत काय भूमिका बजावणार, याबाबत स्थानिक नेत्यांनी मौन बाळगले आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगतात.

काँग्रेसचे अद्याप मौन

आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे यावे लागेल, असे स्थानिक नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृहजिल्हा आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप सत्ता स्थापनेचे कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे नेमके काय होणार, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण