शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण बिघडविणार पंचायत समित्यांचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 16:09 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे

ठळक मुद्देसत्ता स्थापनेचा संभ्रम भाजपच्या नाराज गटाकडे सर्वांच्या नजरा

भंडारा :जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण पंचायत समित्यांचे मात्र गणित बिघडविण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडून सत्ता स्थापन केली, तर पंचायत समितीत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला १३, भाजप १२, शिवसेना व बसपा प्रत्येकी एक आणि चार अपक्ष निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी होणार, अशी चर्चा रंगत होती. नैसर्गिक मित्र असलेले दोन मित्र एकत्र येत असल्याने याबद्दल कुणालाही अडचण नव्हती. मात्र, गत आठ दिवसांपासून भाजपातील एक नाराज गट सक्रिय झाला आहे. हा गट असून, त्यांच्याकडे सहा सदस्य असल्याचा दावा आहे.

मोहाडी नगरपंचायतीत भाजपाने आपल्या गटासोबत दगाफटका केला तर आपण सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे माजी आमदार चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे २१ आणि भाजपच्या नाराज गटातील सहा सदस्य एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते. सात पंचायत समित्यांपैकी भाजपने भंडारा, मोहाडी आणि तुमसरमध्ये वर्चस्व सिद्ध केले, तर लाखनी, साकोली आणि पवनीत काँग्रेस वरचढ ठरली. लाखांदूरमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीची सावध भूमिका

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याच्या हालचालींनी वेग घेतला असला तरी राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. १३ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेत काय भूमिका बजावणार, याबाबत स्थानिक नेत्यांनी मौन बाळगले आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगतात.

काँग्रेसचे अद्याप मौन

आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे यावे लागेल, असे स्थानिक नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृहजिल्हा आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप सत्ता स्थापनेचे कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे नेमके काय होणार, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण