शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण बिघडविणार पंचायत समित्यांचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 16:09 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे

ठळक मुद्देसत्ता स्थापनेचा संभ्रम भाजपच्या नाराज गटाकडे सर्वांच्या नजरा

भंडारा :जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण पंचायत समित्यांचे मात्र गणित बिघडविण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडून सत्ता स्थापन केली, तर पंचायत समितीत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला १३, भाजप १२, शिवसेना व बसपा प्रत्येकी एक आणि चार अपक्ष निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी होणार, अशी चर्चा रंगत होती. नैसर्गिक मित्र असलेले दोन मित्र एकत्र येत असल्याने याबद्दल कुणालाही अडचण नव्हती. मात्र, गत आठ दिवसांपासून भाजपातील एक नाराज गट सक्रिय झाला आहे. हा गट असून, त्यांच्याकडे सहा सदस्य असल्याचा दावा आहे.

मोहाडी नगरपंचायतीत भाजपाने आपल्या गटासोबत दगाफटका केला तर आपण सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे माजी आमदार चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे २१ आणि भाजपच्या नाराज गटातील सहा सदस्य एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते. सात पंचायत समित्यांपैकी भाजपने भंडारा, मोहाडी आणि तुमसरमध्ये वर्चस्व सिद्ध केले, तर लाखनी, साकोली आणि पवनीत काँग्रेस वरचढ ठरली. लाखांदूरमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीची सावध भूमिका

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याच्या हालचालींनी वेग घेतला असला तरी राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. १३ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेत काय भूमिका बजावणार, याबाबत स्थानिक नेत्यांनी मौन बाळगले आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगतात.

काँग्रेसचे अद्याप मौन

आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे यावे लागेल, असे स्थानिक नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृहजिल्हा आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप सत्ता स्थापनेचे कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे नेमके काय होणार, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण