शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

भंडाराची पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:58 IST

शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने ५८ कोटी रूपयांची तरतूद केली असून येत्या दीड वर्षात भंडारावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास मिळेल, असे प्रतिपादन उर्जामंत्री तथा भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देपालकमंत्री : कामगारांना साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने ५८ कोटी रूपयांची तरतूद केली असून येत्या दीड वर्षात भंडारावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास मिळेल, असे प्रतिपादन उर्जामंत्री तथा भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.भंडारा शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, 'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' लाभ वाटप सोहळा आणि रोगनिदान शिबिर कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, कामगार मंडळाचे ओमप्रकाश यादव, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, नगराध्यक्ष सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, कामगार मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम, नगरपरिषद उपाध्यक्ष आशु गोंडाने, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना 'सर्वांसाठी घरे - २०-२२ या योजनेच्या लाभासाठी नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या २९ योजनांचा लाभ शेवटच्या माणसाला दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहराला गेल्या अनेक वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत होता. मुख्यमंत्र्यांनी ५८ कोटींची योजना मंजुर केली. आज या योजनेचे भूमिपूजन झाले असून दीड वर्षात योजना पूर्ण होऊन नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच १५ हजार घरांमध्ये नळ जोडण्या दिल्या जाणार आहे. शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजनांचा लाभ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिला जात असल्याचे त्यांची सांगितले. पेंचच्या लाभक्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना विंधन विहिरीचा लाभ देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश किट वाटप करण्यात आले. राज्यात १३ लाख ७१ हजार ५९१ कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ९ लाख ५० हजार ३४३ बांधकाम कामगारांना ५०० कोटी रूपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात ३० हजार कामगाराची नोंदणी झाली असून यामधून एकही कामगार सुटू नये यासाठी विशेष कॅम्प घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे