शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भंडाराची पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:58 IST

शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने ५८ कोटी रूपयांची तरतूद केली असून येत्या दीड वर्षात भंडारावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास मिळेल, असे प्रतिपादन उर्जामंत्री तथा भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देपालकमंत्री : कामगारांना साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने ५८ कोटी रूपयांची तरतूद केली असून येत्या दीड वर्षात भंडारावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास मिळेल, असे प्रतिपादन उर्जामंत्री तथा भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.भंडारा शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, 'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' लाभ वाटप सोहळा आणि रोगनिदान शिबिर कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, कामगार मंडळाचे ओमप्रकाश यादव, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, नगराध्यक्ष सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, कामगार मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम, नगरपरिषद उपाध्यक्ष आशु गोंडाने, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना 'सर्वांसाठी घरे - २०-२२ या योजनेच्या लाभासाठी नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या २९ योजनांचा लाभ शेवटच्या माणसाला दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहराला गेल्या अनेक वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत होता. मुख्यमंत्र्यांनी ५८ कोटींची योजना मंजुर केली. आज या योजनेचे भूमिपूजन झाले असून दीड वर्षात योजना पूर्ण होऊन नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच १५ हजार घरांमध्ये नळ जोडण्या दिल्या जाणार आहे. शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजनांचा लाभ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिला जात असल्याचे त्यांची सांगितले. पेंचच्या लाभक्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना विंधन विहिरीचा लाभ देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश किट वाटप करण्यात आले. राज्यात १३ लाख ७१ हजार ५९१ कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ९ लाख ५० हजार ३४३ बांधकाम कामगारांना ५०० कोटी रूपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात ३० हजार कामगाराची नोंदणी झाली असून यामधून एकही कामगार सुटू नये यासाठी विशेष कॅम्प घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे