शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

भंडारा तापला ; पारा ४६ अंशावर

By admin | Updated: May 19, 2017 00:49 IST

विदर्भात मागील चार दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले होते.

यावर्षीचा उच्चांक : उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विदर्भात मागील चार दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले होते. गुरूवारी यात वाढ होऊन पारा ४६ अंशावर पोहचला. परिणामी सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांनाच जाणवू लागला आहे. सोमवारी हवामान खात्यातर्फे घेण्यात आलेल्या नोंदीत पारा ४४.५ अंश सेल्सीअस इतका होता. मंगळवारपासून यात वाढ होत गेली. शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. मागीलवर्षी सुद्धा मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशांचा आकडा पार केला होता. उष्ण लहरीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी दुपारच्या सुमारास बाहेर निघने टाळत आहेत. थंड पेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढत असून सायंकाळी ६ वाजतानंतरच बाजारात गर्दी दिसून येत आहे. आणखी काही दिवस उष्णलहरी कायम राहणार असल्याचीही वेदशाळेने वर्तविली आहे. नवतपा प्रारंभ व्हायला सहा दिवसांचा कालावधी क्षुल्लक असतानाच भंडारा जिल्ह्यात यावर्षी आजच्या तापमानाच्या नोंदीने उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत उष्माघाताचे चार बळी मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. याचाच परिणाम उष्माघाताच्या रूपाने दिसून आला. उष्माघातामुळे महिन्याभरात जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत पावणारे चारही व्यक्ती या रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुर आहेत. रणरणत्या उन्हात रोजगार हमीच्या कामात जात असल्यामुळेच काही ठिकाणी कामाच्या वेळाही बदलविण्यात आल्या आहेत. मात्र उन्हाचे चटके मानवी आरोग्यावर परिणाम करीत असल्याचे ज्वलंत उदाहरण आहे.