शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रेल्वे व मैट्रो रेल्वेसाठी भंडारावासीयांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

भंडारा : मुंबई ते कोलकाता या महामार्गावर वसलेल्या राजकीयदृष्टया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून रेल्वेचे जाळे आहे. मात्र भंडारा ...

भंडारा : मुंबई ते कोलकाता या महामार्गावर वसलेल्या राजकीयदृष्टया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून रेल्वेचे जाळे आहे. मात्र भंडारा शहरवासीयांना रेल्वेसाठी १० किलोमीटर अंतरावरील वरठी येथे जावे लागते. त्यामुळे भंडारा शहरातून रेल्वे व मेट्रो सुरू करावी, या मागणीसाठी भंडारा शहरवासीयांनी आता एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी केले आहे.

औद्योगिकदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या भंडारा शहराचे देशात नाव आहे. अशा या ऐतिहासिक भंडारा शहरातील व्यावसायिक असो किंवा कौटुंबिक व्यवस्थेसाठी येथील नागरिकांना रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास १० किलोमीटर अंतरावरील वरठी, तुमसर किंवा नागपूर येथून प्रवास करावा लागतो. रात्री-बेरात्री रेल्वे पकडण्यासाठी जावे लागत असल्याने वेळप्रसंगी अपघातही घडले आहेत.

हे सर्व टाळण्यासाठी भंडारा शहरात रेल्वेचे जाळे व जागा उपलब्ध असताना, स्थानिक प्रशासन तथा रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे भंडारा शहरात रेल्वेस्थानक उभारण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे.

आता रेल्वे मार्गावरच मेट्रोही धावणार आहे. त्यामुळे भंडारा शहरवासीय रेल्वे मेट्रोलाही मुकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडारा शहराचे औद्योगिक, शैक्षणिक, कृषीविषयक कामकाज सुलभतेने व्हावे, जिल्हा स्थान असलेल्या भंडारा शहरातून रेल्वेसह मेट्रो सुरू करावी, यासाठी आता जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. रेल्वेसाठी भंडारा शहरवासीयांनी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी केले आहे.

यानिमित्त मंगळवार, दि. २० जुलैरोजी दुपारी २ वाजता विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.