शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रेल्वे व मैट्रो रेल्वेसाठी भंडारावासीयांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

भंडारा : मुंबई ते कोलकाता या महामार्गावर वसलेल्या राजकीयदृष्टया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून रेल्वेचे जाळे आहे. मात्र भंडारा ...

भंडारा : मुंबई ते कोलकाता या महामार्गावर वसलेल्या राजकीयदृष्टया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून रेल्वेचे जाळे आहे. मात्र भंडारा शहरवासीयांना रेल्वेसाठी १० किलोमीटर अंतरावरील वरठी येथे जावे लागते. त्यामुळे भंडारा शहरातून रेल्वे व मेट्रो सुरू करावी, या मागणीसाठी भंडारा शहरवासीयांनी आता एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी केले आहे.

औद्योगिकदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या भंडारा शहराचे देशात नाव आहे. अशा या ऐतिहासिक भंडारा शहरातील व्यावसायिक असो किंवा कौटुंबिक व्यवस्थेसाठी येथील नागरिकांना रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास १० किलोमीटर अंतरावरील वरठी, तुमसर किंवा नागपूर येथून प्रवास करावा लागतो. रात्री-बेरात्री रेल्वे पकडण्यासाठी जावे लागत असल्याने वेळप्रसंगी अपघातही घडले आहेत.

हे सर्व टाळण्यासाठी भंडारा शहरात रेल्वेचे जाळे व जागा उपलब्ध असताना, स्थानिक प्रशासन तथा रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे भंडारा शहरात रेल्वेस्थानक उभारण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे.

आता रेल्वे मार्गावरच मेट्रोही धावणार आहे. त्यामुळे भंडारा शहरवासीय रेल्वे मेट्रोलाही मुकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडारा शहराचे औद्योगिक, शैक्षणिक, कृषीविषयक कामकाज सुलभतेने व्हावे, जिल्हा स्थान असलेल्या भंडारा शहरातून रेल्वेसह मेट्रो सुरू करावी, यासाठी आता जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. रेल्वेसाठी भंडारा शहरवासीयांनी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी केले आहे.

यानिमित्त मंगळवार, दि. २० जुलैरोजी दुपारी २ वाजता विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.