शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात भंडारा नगरपरिषदेचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणीही करीत आहे. भंडारा नगरपरिषदेने या उपक्रमात भाग घेत स्वच्छतेसाठी विविध उपाय योजले जात आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०२० : नागरिकांच्या प्रतिसादाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील विविध शहरे सहभागी झाले असून त्यात भंडारा नगरपरिषदेचाही समावेश आहे. सध्या या अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु असून अ‍ॅपद्वारे होणाऱ्या या सर्वेक्षणाला नागरिकांच्या प्रतिसादाची गरज आहे.स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणीही करीत आहे. भंडारा नगरपरिषदेने या उपक्रमात भाग घेत स्वच्छतेसाठी विविध उपाय योजले जात आहेत. मात्र या अभियानाला यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.नगरपरिषदेने केलेल्या स्वच्छताविषयक कामांबाबद नागरिकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी अतिशय महत्वाचा आहे. या स्पर्धेत प्रतिसादाला ४०० गुण दिले जाणार आहे. अ‍ॅपद्वारे आठ प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यावयाची आहे. स्वच्छतेवर आधारित असलेल्या प्रश्नांना १ ते १० क्रमांकात गुण द्यावयाचे आहे. शहराच्या लोकसंख्येच्या १५ टक्के नागरिकांचा या स्पर्धेसाठी सहभाग हवा आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी त्यासाठी नागरिकांत जनजागृती करीत आहेत.नगरपरिषदेच्या वतीने त्यासाठी जनजागृती केली जात आहे. अ‍ॅप आणि संकेतस्थळावरून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. नागरिकांनी ३१ जानेवारीपर्यंत अ‍ॅप अथवा पोर्टलवर आपला अभिप्राय नोंदवावा. यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी शहरात फिरून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.-ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान