शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Bhandara Fire; आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात गेली ४० मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 12:44 IST

Bhandara Fire ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला.

ठळक मुद्देनेमके काय घडले त्या पहाटे डाॅक्टर, कर्मचारी उपस्थित असते तर वाचले असते दहा जीव

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात का हाेईना बाेलायला लागले. ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला. या कक्षात डाॅक्टर आणि कर्मचारी उपस्थित असते तर ती निरागस चिमुकले आज आपल्या आईच्या कुशीत बागडत असती.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. दहा बालकांचा बळी गेला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. नेमकी घटना कशी घडली यावर कुणी बाेलायलाच सुरुवातीला तयार नव्हते. आता १३ दिवसांनंतर रुग्णालयातील स्थिती सामान्य हाेत असून या विषयावर चकार शब्द न बाेलणारे आता दबक्या आवाजात बाेलू लागले आहेत. ही घटना घडली तेव्हा कक्षात कुणीही उपस्थित नव्हते. आग लागल्याचे कुणालातरी सर्वप्रथम माहीत झाले आणि त्यानंतर एकच गाेंधळ उडाला. हा गाेंधळ तब्बल चाळीस मिनिटे सुरू हाेता. कुणाला कळत नव्हते, दार ठाेठावणे आणि धावपळ एवढेच सुरू हाेते. घटनास्थळी हाहाकार उडाला हाेता. कर्तव्यावर असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असते तर कदाचित ही घटना टाळताही आली असती, असे आता बाेलले जात आहे. खुद्द जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही त्या रात्रीच्या घटनेची चर्चा सुरू आहे. नेमके काेण दाेषी यावरून चर्चा हाेत आहे. या ठिकाणी नियुक्त डाॅक्टर आण परिचारिका उपस्थित असत्या तर ही घटना टाळता आली असती, असे अनेकजण सांगत आहेत.

खाली-वर जाण्यात गेला वेळ

आंतरुग्ण इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयू कक्षासमाेर एसएनसीयू कक्ष आहे. यामध्ये दाखल नवजात बालकांना दूध देण्याची वेळ ठरवून दिली असते. नेमके त्याचवेळी बाळाला दूध द्यावे लागते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास माता आपल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी गेल्या हाेत्या. हे त्यांचे शेवटचे स्तनपान ठरले. बाळांना दूध दिल्यानंतर सर्व माता प्रसूतीपश्चात वाॅर्डात झाेपी गेल्या हाेत्या. त्यानंतर आरडाओरडा आणि धूर पाहून या कक्षाकडे धाव धेतली. मातांसाेबत असलेले नातेवाईक तळमजल्यावरच हाेते. त्यांना वर येण्यास वेळ झाला. काहींनी त्यांना अडविल्याने बालकापर्यंत पाेहाेचता आले नाही. प्रचंड आरडाओरड हो असल्याने काय हाेत आहे हे कळायच्या आत या दहा बालकांनी जगाचा कायमचा निराेप घेतला.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग