शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

By युवराज गोमास | Updated: February 3, 2024 15:04 IST

राज्यकर्त्यांचे विधानात विसंगती, ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु

युवराज गोमासे, भंडारा : भंडारा शहरात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांचेकडे धानाला बोनस देण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात बोनसची घोषणा झाली. परंतु, दीड महिन्याचा कालावधी लोटूनही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही जीआर निघालेला नाही. त्यातच सध्या राज्यकर्त्यांच्या विधानात परस्पर विसंगती आढळून येत आहेत. त्यामुळे धानाला बोनस मिळणार की शेतीला, यासंबंधाने शेतकऱ्यांच्या संभ्रमाची स्थिती आहे.यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच कीड व रोगांमुळे धानाचे उत्पादन कमालीने घटले. पीक फुलोऱ्यावर असताना अवकाळी झाल्याने पेरव्याचे प्रमाणात २५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आले. त्यातच धान विक्रीसाठी नोंदणीची कटकट आणि उशिरा सुरू झालेले शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धान विकले. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अल्प उत्पादनामुळे धानाची विक्री केली नाही.

अलीकडे राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणतात, ज्यांनी धान खरेदी केंद्रावर धान दिले नाही, त्यांना बोनस मिळणार नाही. दुसरीकडे सत्तेत सामील असलेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल म्हणतात, धान विक्रीसाठी नोंदणी केली. ते सर्व शेतकरी धानाचे बोनससाठी पात्र ठरतील. सरकारमधील दोन व्यक्तींकडून परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच बोनसची घोषणा करून दीड महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा जीआर निघालेला नाही. राज्य शासनाने धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाने धानाचे बोनस जाहिर केले. तेव्हा धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले. देशाेधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. परंतु, राज्यात तीन पक्षाचे सरकार असतांना पक्षातील जबाबदार लोकप्रतिनिधी परस्पर विरोधी भाष्य करीत असतील. त्यातही बोनस बाबत स्पष्टता नसल्यामुळे बोनस कशाला दिला जाणार, धानाला की शेतीला, याविषयी शंका घेण्यास वाव आहे. शासनाने यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत शेतीली बोनस दिला होता, हे विशेष.

ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे?

लोकसभेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यानंतर नगरपरिषद व विधानसभेच्या निवडणुका घोषीत होण्याची शक्यता आहे. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. परंतु, बोनस संबंधी शासन परिपत्रक निघालेला नाही, त्यामुळे ही निवडणुका जिंकण्यापुरती धुळफेक तर नाही, अशा शंका उपस्थित होत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी