शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

By युवराज गोमास | Updated: February 3, 2024 15:04 IST

राज्यकर्त्यांचे विधानात विसंगती, ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु

युवराज गोमासे, भंडारा : भंडारा शहरात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांचेकडे धानाला बोनस देण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात बोनसची घोषणा झाली. परंतु, दीड महिन्याचा कालावधी लोटूनही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही जीआर निघालेला नाही. त्यातच सध्या राज्यकर्त्यांच्या विधानात परस्पर विसंगती आढळून येत आहेत. त्यामुळे धानाला बोनस मिळणार की शेतीला, यासंबंधाने शेतकऱ्यांच्या संभ्रमाची स्थिती आहे.यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच कीड व रोगांमुळे धानाचे उत्पादन कमालीने घटले. पीक फुलोऱ्यावर असताना अवकाळी झाल्याने पेरव्याचे प्रमाणात २५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आले. त्यातच धान विक्रीसाठी नोंदणीची कटकट आणि उशिरा सुरू झालेले शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धान विकले. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अल्प उत्पादनामुळे धानाची विक्री केली नाही.

अलीकडे राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणतात, ज्यांनी धान खरेदी केंद्रावर धान दिले नाही, त्यांना बोनस मिळणार नाही. दुसरीकडे सत्तेत सामील असलेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल म्हणतात, धान विक्रीसाठी नोंदणी केली. ते सर्व शेतकरी धानाचे बोनससाठी पात्र ठरतील. सरकारमधील दोन व्यक्तींकडून परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच बोनसची घोषणा करून दीड महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा जीआर निघालेला नाही. राज्य शासनाने धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाने धानाचे बोनस जाहिर केले. तेव्हा धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले. देशाेधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. परंतु, राज्यात तीन पक्षाचे सरकार असतांना पक्षातील जबाबदार लोकप्रतिनिधी परस्पर विरोधी भाष्य करीत असतील. त्यातही बोनस बाबत स्पष्टता नसल्यामुळे बोनस कशाला दिला जाणार, धानाला की शेतीला, याविषयी शंका घेण्यास वाव आहे. शासनाने यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत शेतीली बोनस दिला होता, हे विशेष.

ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे?

लोकसभेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यानंतर नगरपरिषद व विधानसभेच्या निवडणुका घोषीत होण्याची शक्यता आहे. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. परंतु, बोनस संबंधी शासन परिपत्रक निघालेला नाही, त्यामुळे ही निवडणुका जिंकण्यापुरती धुळफेक तर नाही, अशा शंका उपस्थित होत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी