शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

By युवराज गोमास | Updated: February 3, 2024 15:04 IST

राज्यकर्त्यांचे विधानात विसंगती, ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु

युवराज गोमासे, भंडारा : भंडारा शहरात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांचेकडे धानाला बोनस देण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात बोनसची घोषणा झाली. परंतु, दीड महिन्याचा कालावधी लोटूनही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही जीआर निघालेला नाही. त्यातच सध्या राज्यकर्त्यांच्या विधानात परस्पर विसंगती आढळून येत आहेत. त्यामुळे धानाला बोनस मिळणार की शेतीला, यासंबंधाने शेतकऱ्यांच्या संभ्रमाची स्थिती आहे.यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच कीड व रोगांमुळे धानाचे उत्पादन कमालीने घटले. पीक फुलोऱ्यावर असताना अवकाळी झाल्याने पेरव्याचे प्रमाणात २५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आले. त्यातच धान विक्रीसाठी नोंदणीची कटकट आणि उशिरा सुरू झालेले शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धान विकले. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अल्प उत्पादनामुळे धानाची विक्री केली नाही.

अलीकडे राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणतात, ज्यांनी धान खरेदी केंद्रावर धान दिले नाही, त्यांना बोनस मिळणार नाही. दुसरीकडे सत्तेत सामील असलेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल म्हणतात, धान विक्रीसाठी नोंदणी केली. ते सर्व शेतकरी धानाचे बोनससाठी पात्र ठरतील. सरकारमधील दोन व्यक्तींकडून परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच बोनसची घोषणा करून दीड महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा जीआर निघालेला नाही. राज्य शासनाने धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाने धानाचे बोनस जाहिर केले. तेव्हा धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले. देशाेधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. परंतु, राज्यात तीन पक्षाचे सरकार असतांना पक्षातील जबाबदार लोकप्रतिनिधी परस्पर विरोधी भाष्य करीत असतील. त्यातही बोनस बाबत स्पष्टता नसल्यामुळे बोनस कशाला दिला जाणार, धानाला की शेतीला, याविषयी शंका घेण्यास वाव आहे. शासनाने यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत शेतीली बोनस दिला होता, हे विशेष.

ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे?

लोकसभेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यानंतर नगरपरिषद व विधानसभेच्या निवडणुका घोषीत होण्याची शक्यता आहे. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. परंतु, बोनस संबंधी शासन परिपत्रक निघालेला नाही, त्यामुळे ही निवडणुका जिंकण्यापुरती धुळफेक तर नाही, अशा शंका उपस्थित होत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी