शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:43 IST

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे५० पुरुष कोरोनाचे बळीजिल्ह्यात मृतांचा आकडा ६५ वरपन्नास वर्षावरील ३९ तर ५० वर्षांच्या आत २६ व्यक्तींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाने बळीची संख्या वाढत असून त्यात सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे.कोरोनाने भंडारा जिल्ह्यात पहिला बळी १२ जुलै रोजी घेतला. शहरातील एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात एकही मृत्यू नव्हता. त्यानंतर मृताची संख्या वाढायला लागली. ऑगस्ट महिन्यात मृत्यू संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यातही मृतांचा आकडा वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये ५० वर्षावरील सर्वाधिक पुरुष असल्याचे दिसून येते. तर आतापर्यंत १५ महिलांचा मृत्यू झाला असून त्यातही वृध्दांचाच अधिक समावेश आहे.

११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ५१ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी १५ जणांचा मृत्यू नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वेगाने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.भंडारा तालुक्यात आतापर्यंत ४१ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा शहरातील आहे. त्या खालोखाल तुमसर तालुक्यात १२, मोहाडी ७, साकोली आणि पवनी तालुक्यात प्रत्येकी दोन तर लाखनी तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. भंडारा शहरात मृत्यूची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वाईट अनुभव येत आहे.बाधितांची संख्या तीन हजाराच्या उंबरठ्यावरजिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत दोन हजार ९६० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात १४९३ असून साकोली १९७, लाखांदूर ८९, तुमसर ३०१, मोहाडी ३१५, पवनी २४३, लाखनी तालुक्यातील ३०२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १४ हजार ७५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २९६० व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. सध्या ११९७ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.१६९८ व्यक्तींची कोरोनावर मातकोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे उपचाराखाली असणाऱ्या रुग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २९६० कोरोनाबाधितांपैकी सोमवारी १३६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत १६९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ११९७ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. मात्र मृतांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस