शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

भंडारा जिल्ह्यात १६४२ घरकुल पुर्णत्वास येणार

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

२० मे ते १० जूनपर्यंत विशेष मोहीम : राज्यात १,५७,५१६ घरकुलांचा समावेशमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. २० मे ते १० जून या कालावधीमध्ये अपूर्ण घरकुले पूर्ण करणेची विशेष मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती प्रकल्प संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ३० मे पर्यंत राज्य व्यवस्थापन कक्ष संचालकांना पाठविणे आवश्यक आहे. न पाठविल्यास ही बाब ग्रामविकास सचिवांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात अपूर्ण असणाऱ्या घरकुलांपैकी सर्वसाधारणपणे किमान ७५ टक्के घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. घर हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. घरकुले पूर्णत्वाकरिता शासनस्तावर गंभीर दखल घेण्यात आली असून लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे याकरिता ग्रामविकास मंत्रालय गंभीर आहे.भंडारा जिल्ह्यासह राज्यातील ३४ जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये ७१५०१२ घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ५०४९९१ घरकुले पूर्ण झाली. अपूर्ण घरकुलांची संख्या २१००२१ असून त्यांची टक्केवारी २९ इतकी आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १५७५१६ घरकुले पूर्णत्वास येणार आहेत.भंडारा जिल्ह्यात एकूण मंजूर घरकुले ९८४५, पूर्णत्वास आलेली घरकुले ८२०३, अपूर्ण घरकुलांची संख्या १६४२ इतकी आहे. या विशेष मोहितेअंतर्गत १२३२ घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.राज्यातील इतर जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अहमदनगर १४१४०, अकोला ३८७८, अमरावती १२६६८, औरंगाबाद ५९३८, बीड ३५९४, बुलडाणा ४०६९, चंद्रपूर ५२००, धुळे १०६४१, गडचिरोली ९१९७, गोंदिया ९५८६, हिंगोली २५६४, जळगाव ९६०२, जालना ४६८५, कोल्हापूर २५१६, लातूर ४९२५, नागपूर १६९३, नांदेड ९८९१, नंदूरबार १६४६५, नाशिक १६९१४, उस्मानाबाद ३१४०, पालघर ५८०२, परभणी २३६७, पुणे ५२५८, रायगड ३०२८, रत्नागिरी ७८५, सांगली २९९८, सातारा २७७३, सिंधुदुर्ग २२९, सोलापूर ७५७९, ठाणे १४०५, वर्धा १२०१, नाशिक ६१५९, यवतमाळ १७४८९ अशी संख्या आहे. अपूर्ण घरकुलांची यादी, त्यांची कारणे, लाभार्थ्यांची रद्द झालेली घरकुले, काम सुरू न झालेले घरकुले यांची सविस्तर माहिती विविध नमुन्यातील अर्जात शासनाला सादर करावयाची आहे, असे निर्देश राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र संचालक शेंडगे यांनी पाठविले आहे.