शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात १६४२ घरकुल पुर्णत्वास येणार

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

२० मे ते १० जूनपर्यंत विशेष मोहीम : राज्यात १,५७,५१६ घरकुलांचा समावेशमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. २० मे ते १० जून या कालावधीमध्ये अपूर्ण घरकुले पूर्ण करणेची विशेष मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती प्रकल्प संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ३० मे पर्यंत राज्य व्यवस्थापन कक्ष संचालकांना पाठविणे आवश्यक आहे. न पाठविल्यास ही बाब ग्रामविकास सचिवांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात अपूर्ण असणाऱ्या घरकुलांपैकी सर्वसाधारणपणे किमान ७५ टक्के घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. घर हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. घरकुले पूर्णत्वाकरिता शासनस्तावर गंभीर दखल घेण्यात आली असून लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे याकरिता ग्रामविकास मंत्रालय गंभीर आहे.भंडारा जिल्ह्यासह राज्यातील ३४ जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये ७१५०१२ घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ५०४९९१ घरकुले पूर्ण झाली. अपूर्ण घरकुलांची संख्या २१००२१ असून त्यांची टक्केवारी २९ इतकी आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १५७५१६ घरकुले पूर्णत्वास येणार आहेत.भंडारा जिल्ह्यात एकूण मंजूर घरकुले ९८४५, पूर्णत्वास आलेली घरकुले ८२०३, अपूर्ण घरकुलांची संख्या १६४२ इतकी आहे. या विशेष मोहितेअंतर्गत १२३२ घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.राज्यातील इतर जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अहमदनगर १४१४०, अकोला ३८७८, अमरावती १२६६८, औरंगाबाद ५९३८, बीड ३५९४, बुलडाणा ४०६९, चंद्रपूर ५२००, धुळे १०६४१, गडचिरोली ९१९७, गोंदिया ९५८६, हिंगोली २५६४, जळगाव ९६०२, जालना ४६८५, कोल्हापूर २५१६, लातूर ४९२५, नागपूर १६९३, नांदेड ९८९१, नंदूरबार १६४६५, नाशिक १६९१४, उस्मानाबाद ३१४०, पालघर ५८०२, परभणी २३६७, पुणे ५२५८, रायगड ३०२८, रत्नागिरी ७८५, सांगली २९९८, सातारा २७७३, सिंधुदुर्ग २२९, सोलापूर ७५७९, ठाणे १४०५, वर्धा १२०१, नाशिक ६१५९, यवतमाळ १७४८९ अशी संख्या आहे. अपूर्ण घरकुलांची यादी, त्यांची कारणे, लाभार्थ्यांची रद्द झालेली घरकुले, काम सुरू न झालेले घरकुले यांची सविस्तर माहिती विविध नमुन्यातील अर्जात शासनाला सादर करावयाची आहे, असे निर्देश राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र संचालक शेंडगे यांनी पाठविले आहे.