शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील भंडारा बायपास दशकापासून रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:34 IST

शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रखडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अपघाताने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे पुन्हा बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची कायम कोंडी : शहरातील नागरिक भीतीच्या सावटात, बेला अपघाताने प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रखडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अपघाताने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे पुन्हा बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.भंडारा जिल्हा मुख्यालयाच्या शहरातून अगदी मधोमध कलकत्ता-मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहरातील मुख्य शासकीय कार्यालय आणि महत्वाच्या चौकातूनच हा महामार्ग जातो. अहोरात्र या मार्गावरून अवजड वाहनांसह भरधाव प्रवासी वाहने धावत असतात. दिवसाच्या वेळी या महामार्गावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठणारी ठरत आहे. शहरातील या महामार्गावर ठिकठिकाणी चौक आहेत. या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी अनुभवास मिळते. ट्रक चालक तर भरधाव आणि बेदरकारपणे शहरातूनही वाहन चालविताना दिसतात. त्यामुळेच शहरातील या महामार्गाला बायपास निर्माण करावा अशी मागणी दहा वर्षापूर्वी करण्यात आली होती. परंतु अद्यापही ती पूर्ण झाली नाही.या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र मुजबी ते सिंगोरी या सहा किमी रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले नाही.हा मार्ग अगदी भंडारा शहरातून जातो. महामार्गासाठी बायपासचा प्रश्न दशकापासून अधांतरीच आहे. एखादा लहानसाही अपघात झाला तरी शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. शनिवारी बेला येथे झालेल्या अपघातानंतर तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. भंडारा शहरात वाहनांच्या रांगाच्या रांगा दुपारी २ वाजेपर्यंत दिसत होत्या. यामुळेच भंडारा शहरासाठी बायपास आवश्यक झाला आहे.अहोरात्र सुरु असते वाहतूकराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधून हा महामार्ग जातो. महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर, भंडारा आणि छत्तीसगडमधून दुर्ग, रायपूर, महासमुंद, संबलपूर असा हा मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरु असते. त्यातही अवजड वाहने आणि ट्रेलर शहरातून आले की वाहतुकीचा खोळंबा होतो.