शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

महामार्गावरील भंडारा बायपास दशकापासून रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:34 IST

शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रखडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अपघाताने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे पुन्हा बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची कायम कोंडी : शहरातील नागरिक भीतीच्या सावटात, बेला अपघाताने प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रखडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अपघाताने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे पुन्हा बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.भंडारा जिल्हा मुख्यालयाच्या शहरातून अगदी मधोमध कलकत्ता-मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहरातील मुख्य शासकीय कार्यालय आणि महत्वाच्या चौकातूनच हा महामार्ग जातो. अहोरात्र या मार्गावरून अवजड वाहनांसह भरधाव प्रवासी वाहने धावत असतात. दिवसाच्या वेळी या महामार्गावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठणारी ठरत आहे. शहरातील या महामार्गावर ठिकठिकाणी चौक आहेत. या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी अनुभवास मिळते. ट्रक चालक तर भरधाव आणि बेदरकारपणे शहरातूनही वाहन चालविताना दिसतात. त्यामुळेच शहरातील या महामार्गाला बायपास निर्माण करावा अशी मागणी दहा वर्षापूर्वी करण्यात आली होती. परंतु अद्यापही ती पूर्ण झाली नाही.या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र मुजबी ते सिंगोरी या सहा किमी रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले नाही.हा मार्ग अगदी भंडारा शहरातून जातो. महामार्गासाठी बायपासचा प्रश्न दशकापासून अधांतरीच आहे. एखादा लहानसाही अपघात झाला तरी शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. शनिवारी बेला येथे झालेल्या अपघातानंतर तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. भंडारा शहरात वाहनांच्या रांगाच्या रांगा दुपारी २ वाजेपर्यंत दिसत होत्या. यामुळेच भंडारा शहरासाठी बायपास आवश्यक झाला आहे.अहोरात्र सुरु असते वाहतूकराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधून हा महामार्ग जातो. महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर, भंडारा आणि छत्तीसगडमधून दुर्ग, रायपूर, महासमुंद, संबलपूर असा हा मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरु असते. त्यातही अवजड वाहने आणि ट्रेलर शहरातून आले की वाहतुकीचा खोळंबा होतो.