शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्याला वैनगंगेचा वेढा, पर्लकोटा नदीमुळे भामरागड जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 19:49 IST

Bhandara News संततधार पावसाने मध्य प्रदेशसह गाेंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे६६० पेक्षा जास्त कुटुंबांना हलविले सुरक्षित स्थळी

भंडारा/ गडचिरोली : गत तीन दिवसांपासूनच्या संततधार पावसाने मध्य प्रदेशसह गाेंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा जिल्ह्यातील एका राज्य मार्गासह ८१ रस्त्यांवरील वाहतूक पुरामुळे बंद पडली आहे. छत्तीसगडमधून येणाऱ्या पर्लकोटा नदीचे पाणी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये शिरले आहे. पुरामुळे जिल्हाभरात १९ मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनी, नागपूर नाका परिसर, भाेजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शाेध व बचाव कार्यासाठी एसडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे. पूरबाधितांची राहण्याची व जेवणाची साेय करण्यात आली आहे. वैनगंगेच्या काेपामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. शेतशिवारात माेठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. माेहाडी शहरासह तालुक्यात वैनगंगा व सूर नदीचे पाणी गावांत शिरले. लाखांदूर तालुक्यातही पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पवनी तालुक्यातही अशीच स्थिती आहे.

नाल्याच्या पुरात वाहून गेला एक जण

तुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहनी नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीने पूल ओलांडणाऱ्यांपैकी एक जण वाहून गेला. श्यामा सांगोळे असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा सहकारी विशाल गजभिये याला वाचविण्यात यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सिलेगाव ते वाहनी नाल्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यातून विशाल गजभिये व श्यामा सांगोळे (दोन्ही रा. तिरोडा) हे दुचाकी (एम.एच. ३६ -९९५७) ने जात होते. त्यावेळी तिथे उपस्थित होमगार्ड जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे न ऐकता ते दुचाकी नाल्यावरून काढण्याचा प्रयत्न करू लागले. याचवेळी घसरून दोघे जण पुराच्या पाण्यात कोसळले.

गडचिरोलीत पुराने अडविले १९ मार्ग

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारच्या रिमझिम पावसानंतर मंगळवारी पावसाने पूर्णपणे उसंत घेतली असताना पूरस्थिती मात्र वाढल्याचे चित्र होते. गोसेखुर्द प्रकल्पातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झालेल्या एकूण ४३१ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.

भामरागड जलमय

पर्लकोटा नदीचे पाणी सोमवारी पुन्हा एकदा पुलावर चढून भामरागडमध्ये शिरले. मंगळवारी दिवसभर ही स्थिती कायम होती. मुख्य मार्गावरील अनेक घरे, दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने येथील २३० नागरिकांना सुरक्षितस्थळी आश्रय देण्यात आला आहे.

टॅग्स :floodपूर