शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

सावधान!, अन्यथा स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागेल प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST

भंडारा जिल्ह्यात १ एप्रिलला एकाचा कोरोनाने मृत्यू झाला, २ एप्रिलला तिघांचा मृत्यू, ३ एप्रिलला चार जणांचा मृत्यू झाला तर ...

भंडारा जिल्ह्यात १ एप्रिलला एकाचा कोरोनाने मृत्यू झाला, २ एप्रिलला तिघांचा मृत्यू, ३ एप्रिलला चार जणांचा मृत्यू झाला तर ४ एप्रिलला पुन्हा एकाचा कोरोनाने मृत्यू झाला.

................................यासोबतच भंडारा शहरात नैसर्गिक कारणांनी मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ आहे. १ एप्रिलला दोघांचा मृत्यू झाला, ३ एप्रिलला दोघांचा मृत्यू, ४ एप्रिलला एकाचा मृत्यू झाला तर काल ५ एप्रिल रोजी चौघांचा मृत्यू झाला. ...........................................

.त्यामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० हजार ८६१ वर पोहोचला आहे. त्यातही भंडारा शहर व तालुका हिटलिस्टवर असल्याचे दिसून येते. सर्वाधिक रुग्ण हे भंडारा तालुक्यात असून, आतापर्यंत नऊ हजार ६१ पॉझिटिव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आले आहेत. त्यानंतर मोहाडी, तुमसर, पवनी, लाखणी, साकोली, लाखांदूर असे संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात मृतांचा आकडा ३५२ च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व नागरिकांनी एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बॉक्स

नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील नोंदीतही वाढ

१ भंडारा नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भंडारा शहरात १ एप्रिल ते ५ एप्रिलपर्यंत ९ जणांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

२ यासोबतच दररोज जन्म आणि मृत्यूची नोंद करण्याकरिता अनेक जण येथे येत आहेत. आता सर्व कामकाज ऑनलाइन झाल्याने अनेकदा नागरिकांना येथे नाेंदीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

३ भंडारा नगरपरिषदेत दररोज किमान ५० ते ६० जण जन्माचे दाखले तसेच जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे विशेष उपाययोजनेचीही गरज आहे.

बॉक्स

दररोज तीन ते चार जणांवर होतात अंत्यसंस्कार

भंडारा शहरात दोन स्मशानभूमी आहेत. त्यात एक पूर्वीपासूनच असलेली वैनगंगा नदी घाटावरील स्मशानभूमी तर दुसरी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगत गिरोला हद्दीत असलेली नवीन कोविड स्मशानभूमी आहे. या ठिकाणीही कधी एक तर कधी तीन ते चार जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी अंत्यविधीसाठी जातानाही कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेकदा भावनावश होऊन अनेक नातेवाईक व इतरही मयतीचा कार्यक्रम आहे, गेलेच पाहिजे म्हणून हजेरी लावतात; मात्र वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.