शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचा गरिबांना लाभ हीच खरी समाजसेवा

By admin | Updated: March 6, 2017 00:15 IST

अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत.

नाना पटोले : साकोलीत जनता दरबार, पाणी, रुग्णालय, बीपीएलचा प्रश्न गाजलासाकोली : अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत. सामाजिक भान ठेवून सामाजिक दृष्टीकोण ठेऊन मनाची मानसिकता बदलवून समाजाला आपले काही देणे आहे हे समजले पाहिजे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ गरीबांना दयावा हीच खरी समाजसेवा आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी गरीब जनतेला त्रास देवू नये, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील मंगलमुर्ती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनिंयत्रण अंतर्गत खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी, रेखा वासनिक, दिपक मेंढे, सभापती धनपाल उंदिरवाडे, अशोक कापगते, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार खडतकर, पोलिस निरिक्षक जगदिश गायकवाड, आदी उपस्थित होते.जनता दरबारात मुंडीपार येथील वैशाली विजय पटले यांनी भेल प्रकल्प केव्हा सुरू होणार व बेरोजगारी कधी दुर होणार याविषयी प्रश्न विचारला. डॉ. नरेश राऊत यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालय आॅक्सीजनवर असुन विद्युत, पाणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आदी व्यवस्था करण्यात यावी हा मुद्दा उचलला. साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक रोहिणी मुंगूलमारे यांनी खूप लोक गरीब आहेत, परंतु त्यांचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांना योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे, हा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. गोंडउमरी येथील पौर्णिमा चांदेवार यांनी गोंडउमरीत दारुबंदी असुन सुध्दा दारु सुरु राहते, हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयाची नोंद घेतली. असे अनेकांनी विविध प्रश्न विचारले त्यावर अनेक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पंरतु प्रत्यक्ष त्यांच्या अर्जाचा विचार करुन प्रश्न निकालात काढावे नाहीतर जनता दरबार संपला आपल्याला काम करायचे आहे. असे वेळकाढु धोरण बरोबर नहाी. एकुण प्रशासनाकडे २०० अर्ज प्राप्त झाले व वेळेवर वेगळे प्रश्न उपस्थित झाले.नाना पटोले यांनी एका अधिकाऱ्याला विचारले साकोली तालुक्यात पाणी टंचाई आहे काय? त्या अधिकाऱ्याने आकडेवारीवरुन कोणत्याच गावात पाणी टंचाई असे सांगितले पंरतु जनता दरबारातील खुप लोक उठून आमच्या गावात पाणी टंचाई प्रत्यक्ष या आम्ही सांगतो. त्यावेळेस अधिकाऱ्यांची खासदारासमोर धांदल झाली. कित्येक गावात पाणी टंचाई आहे हे जरा लक्षात घ्या तसे सर्वेक्षण करा, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य बीपीएल अंतर्गत कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मृत पावले, तर त्या योजनेअंतर्गत २० हजार रुपये दिले जाते. अशा ३३ लाभार्थ्यांना खा. पटोले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकंदरीतच अनेक समस्या या जनता दरबारातून लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासन - प्रशासन पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)