शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

योजनेचा गरिबांना लाभ हीच खरी समाजसेवा

By admin | Updated: March 6, 2017 00:15 IST

अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत.

नाना पटोले : साकोलीत जनता दरबार, पाणी, रुग्णालय, बीपीएलचा प्रश्न गाजलासाकोली : अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत. सामाजिक भान ठेवून सामाजिक दृष्टीकोण ठेऊन मनाची मानसिकता बदलवून समाजाला आपले काही देणे आहे हे समजले पाहिजे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ गरीबांना दयावा हीच खरी समाजसेवा आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी गरीब जनतेला त्रास देवू नये, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील मंगलमुर्ती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनिंयत्रण अंतर्गत खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी, रेखा वासनिक, दिपक मेंढे, सभापती धनपाल उंदिरवाडे, अशोक कापगते, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार खडतकर, पोलिस निरिक्षक जगदिश गायकवाड, आदी उपस्थित होते.जनता दरबारात मुंडीपार येथील वैशाली विजय पटले यांनी भेल प्रकल्प केव्हा सुरू होणार व बेरोजगारी कधी दुर होणार याविषयी प्रश्न विचारला. डॉ. नरेश राऊत यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालय आॅक्सीजनवर असुन विद्युत, पाणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आदी व्यवस्था करण्यात यावी हा मुद्दा उचलला. साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक रोहिणी मुंगूलमारे यांनी खूप लोक गरीब आहेत, परंतु त्यांचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांना योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे, हा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. गोंडउमरी येथील पौर्णिमा चांदेवार यांनी गोंडउमरीत दारुबंदी असुन सुध्दा दारु सुरु राहते, हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयाची नोंद घेतली. असे अनेकांनी विविध प्रश्न विचारले त्यावर अनेक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पंरतु प्रत्यक्ष त्यांच्या अर्जाचा विचार करुन प्रश्न निकालात काढावे नाहीतर जनता दरबार संपला आपल्याला काम करायचे आहे. असे वेळकाढु धोरण बरोबर नहाी. एकुण प्रशासनाकडे २०० अर्ज प्राप्त झाले व वेळेवर वेगळे प्रश्न उपस्थित झाले.नाना पटोले यांनी एका अधिकाऱ्याला विचारले साकोली तालुक्यात पाणी टंचाई आहे काय? त्या अधिकाऱ्याने आकडेवारीवरुन कोणत्याच गावात पाणी टंचाई असे सांगितले पंरतु जनता दरबारातील खुप लोक उठून आमच्या गावात पाणी टंचाई प्रत्यक्ष या आम्ही सांगतो. त्यावेळेस अधिकाऱ्यांची खासदारासमोर धांदल झाली. कित्येक गावात पाणी टंचाई आहे हे जरा लक्षात घ्या तसे सर्वेक्षण करा, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य बीपीएल अंतर्गत कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मृत पावले, तर त्या योजनेअंतर्गत २० हजार रुपये दिले जाते. अशा ३३ लाभार्थ्यांना खा. पटोले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकंदरीतच अनेक समस्या या जनता दरबारातून लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासन - प्रशासन पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)