शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

योजनेचा गरिबांना लाभ हीच खरी समाजसेवा

By admin | Updated: March 6, 2017 00:15 IST

अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत.

नाना पटोले : साकोलीत जनता दरबार, पाणी, रुग्णालय, बीपीएलचा प्रश्न गाजलासाकोली : अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत. सामाजिक भान ठेवून सामाजिक दृष्टीकोण ठेऊन मनाची मानसिकता बदलवून समाजाला आपले काही देणे आहे हे समजले पाहिजे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ गरीबांना दयावा हीच खरी समाजसेवा आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी गरीब जनतेला त्रास देवू नये, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील मंगलमुर्ती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनिंयत्रण अंतर्गत खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी, रेखा वासनिक, दिपक मेंढे, सभापती धनपाल उंदिरवाडे, अशोक कापगते, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार खडतकर, पोलिस निरिक्षक जगदिश गायकवाड, आदी उपस्थित होते.जनता दरबारात मुंडीपार येथील वैशाली विजय पटले यांनी भेल प्रकल्प केव्हा सुरू होणार व बेरोजगारी कधी दुर होणार याविषयी प्रश्न विचारला. डॉ. नरेश राऊत यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालय आॅक्सीजनवर असुन विद्युत, पाणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आदी व्यवस्था करण्यात यावी हा मुद्दा उचलला. साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक रोहिणी मुंगूलमारे यांनी खूप लोक गरीब आहेत, परंतु त्यांचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांना योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे, हा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. गोंडउमरी येथील पौर्णिमा चांदेवार यांनी गोंडउमरीत दारुबंदी असुन सुध्दा दारु सुरु राहते, हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयाची नोंद घेतली. असे अनेकांनी विविध प्रश्न विचारले त्यावर अनेक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पंरतु प्रत्यक्ष त्यांच्या अर्जाचा विचार करुन प्रश्न निकालात काढावे नाहीतर जनता दरबार संपला आपल्याला काम करायचे आहे. असे वेळकाढु धोरण बरोबर नहाी. एकुण प्रशासनाकडे २०० अर्ज प्राप्त झाले व वेळेवर वेगळे प्रश्न उपस्थित झाले.नाना पटोले यांनी एका अधिकाऱ्याला विचारले साकोली तालुक्यात पाणी टंचाई आहे काय? त्या अधिकाऱ्याने आकडेवारीवरुन कोणत्याच गावात पाणी टंचाई असे सांगितले पंरतु जनता दरबारातील खुप लोक उठून आमच्या गावात पाणी टंचाई प्रत्यक्ष या आम्ही सांगतो. त्यावेळेस अधिकाऱ्यांची खासदारासमोर धांदल झाली. कित्येक गावात पाणी टंचाई आहे हे जरा लक्षात घ्या तसे सर्वेक्षण करा, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य बीपीएल अंतर्गत कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मृत पावले, तर त्या योजनेअंतर्गत २० हजार रुपये दिले जाते. अशा ३३ लाभार्थ्यांना खा. पटोले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकंदरीतच अनेक समस्या या जनता दरबारातून लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासन - प्रशासन पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)