शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शेतकऱ्यांना मिळणार नेरला उपसा सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:19 IST

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

ठळक मुद्देदखल 'लोकमत'ची : साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. 'पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड' या आशयाचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच नेरला उपसा सिंचन प्रकल्प प्रशासन खळबळून जागे झाले. त्यांनी पाण्याची पातळी वाढविण्याच्या कामाला प्रारंभ केला असून लवकरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.माहितीनुसार, नेरला उपसा सिंचन सुरू व्हायला कमीत कमी २४१.२९ एवढी पाण्याची पातळी असणे अतिआवश्यक आहे. त्यामुळे ही पातळी जोपावेतो पूर्ण होणार नाही तोपावेतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकणार नाही त्यासाठी गोसेखुर्द धरणाचे वक्रव्दार बंद केले आहे. आता प्रकल्पात पाण्याची पातळीकिती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत मात्र कुठलीही माहिती नाही. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत भाजपचे पवनी तालुकाध्यक्ष सुरेंद्र आयतुलवार यांनी नेरला उपसा सिंचनाला भेट देऊन अधिकाºयांशी चर्चा केली. यासंबधी किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे, मोहन सुरकर, अमोल उराडे, भगवान करंजेकर, कुलदीप उराडे, चेतन भानारकर व शेतकºयांनी नेरला उपसा सिंचनला भेट दिली असता अधिकारी व कर्मचाºयांमध्ये उदासीनता दिसून आली. नेरला उपसा सिंचनामध्ये असलेले पाणी यापुर्वीच गोसेखुर्द धरणात सोडण्यात आहे. त्यामुळे सध्यस्थितीत पाण्याची पातळी खालावली आहे. आता अधिकारी ‘साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न’ करीत आहे. तोपर्यत मात्र शेतकरी देशोधडीला लागलेला दिसेल, अशी संतप्त प्रतिक्रीया दिली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्याप्रमाणे पाण्याची पातळी वाढवायला सुरूवात झाली आहे. नेरला उपसा सिंचन सुरू व्हायला कमीत कमी जेवढी पातळी पािहजे तेवढी झाली की लगेच नेरला उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडल्या जाणार आहे.-अमोल वैद्य, सहायक अभियंता, नेरला उपसा सिंचन प्रकल्प