शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

शेतकऱ्यांना मिळणार नेरला उपसा सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:19 IST

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

ठळक मुद्देदखल 'लोकमत'ची : साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. 'पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड' या आशयाचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच नेरला उपसा सिंचन प्रकल्प प्रशासन खळबळून जागे झाले. त्यांनी पाण्याची पातळी वाढविण्याच्या कामाला प्रारंभ केला असून लवकरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.माहितीनुसार, नेरला उपसा सिंचन सुरू व्हायला कमीत कमी २४१.२९ एवढी पाण्याची पातळी असणे अतिआवश्यक आहे. त्यामुळे ही पातळी जोपावेतो पूर्ण होणार नाही तोपावेतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकणार नाही त्यासाठी गोसेखुर्द धरणाचे वक्रव्दार बंद केले आहे. आता प्रकल्पात पाण्याची पातळीकिती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत मात्र कुठलीही माहिती नाही. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत भाजपचे पवनी तालुकाध्यक्ष सुरेंद्र आयतुलवार यांनी नेरला उपसा सिंचनाला भेट देऊन अधिकाºयांशी चर्चा केली. यासंबधी किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे, मोहन सुरकर, अमोल उराडे, भगवान करंजेकर, कुलदीप उराडे, चेतन भानारकर व शेतकºयांनी नेरला उपसा सिंचनला भेट दिली असता अधिकारी व कर्मचाºयांमध्ये उदासीनता दिसून आली. नेरला उपसा सिंचनामध्ये असलेले पाणी यापुर्वीच गोसेखुर्द धरणात सोडण्यात आहे. त्यामुळे सध्यस्थितीत पाण्याची पातळी खालावली आहे. आता अधिकारी ‘साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न’ करीत आहे. तोपर्यत मात्र शेतकरी देशोधडीला लागलेला दिसेल, अशी संतप्त प्रतिक्रीया दिली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्याप्रमाणे पाण्याची पातळी वाढवायला सुरूवात झाली आहे. नेरला उपसा सिंचन सुरू व्हायला कमीत कमी जेवढी पातळी पािहजे तेवढी झाली की लगेच नेरला उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडल्या जाणार आहे.-अमोल वैद्य, सहायक अभियंता, नेरला उपसा सिंचन प्रकल्प