शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे

By admin | Updated: February 11, 2015 00:42 IST

सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षीत जीवन जगता यावे यासाठी शासनाचे विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, ...

साकोली : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षीत जीवन जगता यावे यासाठी शासनाचे विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी व्यक्त केले.नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोलीच्या प्रांगणात महसूल विभागातर्फे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियान विस्तारित स्वरूपातील समाधान योजना कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले होते. अतिथी म्हणून तहसिलदार डॉ. हंसा गोहणे, सभापती नारायण वरठे, उपसभापती श्रावण बोरकर, पंचाय समिती सदस्य यादोराव कापगते, जिल्हा परिषद सदस्य सुनिता कापगते, जया भुरे, कृषी अधिकारी चौधरी, खंडविकस अधिकारी व्ही.टी. बोरकर, नायब तहसिलदार दिनकर खोत, पवार व जी. एस. मासुरकर उपस्थित होते.प्रास्ताविक तहसिलदार डॉ. हंसा मोहणे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, तीन वर्षापासून तालुक्यातील सर्वच कामाची नोंद बुक मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत जातीचे दाखले २ हजार ६०२, रहिवासी दाखले १ हजार ४७०, उत्पन्नाचे दाखले पाच हजार ६५, ९४ गावात चावडी वाचन करून ३८७ मय्यत खातेदार व १८० वारस फेरफार प्रकरणे आहेत. दोन हजार वनजमिनीचे अर्ज प्राप्त व ३८७ पट्टे वाटप, १ हजार २३० लाभार्थ्यांना नवीन राशनकार्ड वाटप, संजय गांधी योजना ५५०, श्रावणबाळ ४५०, राष्ट्रीय कुटूंब योजना १०० प्रकरणे व आम आदमी १६५ प्रकरणे मंजूर करून लाभ देण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी महसूल विभागातर्फे १२२, कृषी विभाग ७३, भूमिअभिलेख कार्यालय ६७, बालविकास कार्यालय ८८, पशुसंवर्धन विभाग ११९, पंचायत समिती ५५, आरोग्य विभाग १३०, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना २७ प्रकरणे यावेळी तात्काळ पूर्ण करण्यात आले असून ही कामे या कार्यक्रमाची यशस्विताच म्हणावी लागेल, असे मत उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन साकोलीचे मंडळ अधिकारी निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन तलाठी शिंदे व तलाठी ठाकरे यांनी केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)