शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बोगस लाभार्थ्यांना लाभ

By admin | Updated: July 23, 2015 00:32 IST

शासनाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन वाढविण्यासाठी अनेक विशेष योजना अंमलात आणल्या आहेत.

बेरोजगारांवर कुऱ्हाड : शासनाने योग्य अंमलबजावणी करण्याची गरजकोंढा (कोसरा) : शासनाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन वाढविण्यासाठी अनेक विशेष योजना अंमलात आणल्या आहेत. परंतु त्याचा लाभ बोगस लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. यामुळे पवनी तालुक्यातील शेकडो गरजू लाभार्थी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित आहेत. कोंढा येथे दर बुधवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात पशुधनाच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. शेतकऱ्यांचा पशुपालन हा जोडधंदा आर्थिक प्रगतीकडे नेणारा आहे. अनेकांनी शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. यासोबतच शासनाने बेरोजगारी कमी करण्यासाठी या जोडधंद्याची तरुणांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांकडून याचा लाभ गरजूंना देण्याऐवजी बोगस लाभार्थ्यांना देण्यात धन्यता मानतात. शासनाने पशुधन विकासासाठी एकात्मिक शेळी मेंढी व रस्ते विकास योजना, वराह पालन विकास, पोल्ट्री फार्मची स्थापना अशा योजना अस्तित्वात आणल्या आहेत. या योजनांमध्ये २५ ते ३३ टक्क्यांपर्यंत अनुदान, प्रकल्प उभे करताना ५० टक्के बिनव्याजी कर्ज पुरवठा अशा सवलती आहेत. या योजनांना नाबार्डकडून कर्जपुरवठा होत असतो. या सर्व योजनांची माहिती पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे आहे. ही माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास हा विभाग अपयशी ठरला आहे. या विभागाचे पशु चिकित्सालयावर देखरेख असते. परंतु अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी पशुचिकित्सालयात उपचार कमी खासगी सेवा जास्त करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. बोगस पशुचिकित्सक देखील कोंढा परिसरात खासगी व्यवसाय करून सामान्य जनतेची लुबाडणूक करीत आहे.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी पशुधन विकास योजना फायदेशीर ठरू शकतात. पण अशा योजनांची माहितीच मिळत नाही. त्यामुळे कोंढा परिसरात बेरोजगारीत वाढ होत आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी स्वार्थी हेतूने बनावट लाभार्थी दाखवून विशेष घटक योजनेचे अनुदान लाटल्याचा प्रकार देखील समोर आले आहे. पशुधन विकासासाठी असलेल्या योजनांचा फायदा योग्स लाभार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना मिळाल्यास अनेकांची बेरोजगारी दूर होवू शकते. याची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. यासंबंधी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. वैद्य यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगून बोलण्याचे टाळले. (वार्ताहर)