शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

शूरवीरांमुळेच भारत देश अखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:05 PM

भारत देश शूरवीरांच्या बलिदानाने आज अखंड आहे. शूरवीरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपण काम करायला पाहिजे. समाजाची प्रगती मार्गदर्शनामुळे होते. क्षत्रीय राजपूत समाजात सगळ्यांचा योगदान असणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज समोर समोर चालत राहावे. समाजाची उन्नती व्हावी, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखनीत महाराणा प्रताप यांचा ४७८ वा जन्मोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भारत देश शूरवीरांच्या बलिदानाने आज अखंड आहे. शूरवीरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपण काम करायला पाहिजे. समाजाची प्रगती मार्गदर्शनामुळे होते. क्षत्रीय राजपूत समाजात सगळ्यांचा योगदान असणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज समोर समोर चालत राहावे. समाजाची उन्नती व्हावी, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.महाराणा प्रताप क्षत्रीय युवा मंच तर्फे वीर शिरोमणी क्षत्रीय कुलभूषण महाराणा प्रताप यांची ४७८ वा जन्मोत्सव लाखनी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार पटेल बोलत होते. १८ जून ला सकाळी बाईक रॅली सोबत महाराणा प्रताप यांची शोभायात्रा काढण्यात आली.‘जय महाराणा जय राजपुताना’ च्या घोषणेने संपूर्ण लाखनी नगरी दुमदुमली होती. या मोटार साईकील रॅलीचे नेतृत्व जिल्हा कार्याध्यक्ष धनू व्यास, माजी तहसीलदार राजीवसिंह शक्करवार यांनी केले. रॅली मुरमाडी सावरी लाखनीच्या मुख्य मार्गाने डी.जे. तालावर फटाक्यांच्या आतषबाजीने काढण्यात आली. ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रा पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी उसळली होती.दुपारी १२ वाजता सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता संगीत आर्केस्ट्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अरण्ययात्री फाउंडेशन तर्फे पक्षी फोटो प्रदर्शनी, राजे गार्डन आर्ट प्रदर्शनी लावण्यात आली होती.सायंकाळी ६ वाजता महाराणा प्रताप जन्मोत्सव समारोहाच्या उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.नाना पटोले म्हणाले, शूरविरांनी अन्यायाच्या विरुद्ध लढाई केली. राजाची गोष्ट येते तेव्हा महाराणा प्रताप यांची आठवण होते. महाराष्ट्रात ४५ लाखांच्या वर क्षत्रीय राजपूत समाजातील लोक राहतात. महाराणा प्रतापांच्या वंशजांना समोर जाण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, पंकज सिंह, कविता परिहार, राजीव शक्करवार, माजी आमदार सेवक वाघाये, ओमप्रकाशसिंह पवार, जि.प. सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी महाराणा प्रताप क्षत्रीय युवा मंच समिती लाखनी कडून मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व महाराणा प्रताप सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.खुशी कलचुरी ने महाराणा प्रताप यांच्या जीवन चारित्र्यावर सुंदर कवितेचे सादरीकरण केले. यावेळी सत्कार मूर्ती खासदार मधुकर कुकडे, अखिल भारतीय क्षत्रीय महासभेचे प्रदेश अध्यक्ष ठाकुर पंकज सिंग, प्रदेश सचिव कविता परिहार, माजी तहसीलदार राजीव शक्करवार, अविनाश ब्राम्हणकर, सेवक वाघाये यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन समोर कार्य करावे असे सांगितले.जन्मोत्सव समारोहासाठी महाराणा प्रताप क्षत्रीय युवा मंच चे अध्यक्ष घनश्यामसिंह परिहार, धनू व्यास, कुलदीपसिंह बाच्छील, लक्ष्मीकांत बघेल, रमेशसिंह बैस, पवनसिंह कच्छवाह, आकाश सिंह गहरवार, करणसिंह व्यास, शैलेशसिंह कोहरे, लिखीरामसिंह सूर्यवंशी, हेमराजसिंह भारद्वाज, सुरेशसिंह बघेल, रंजनसिंह चौहाण, रवीसिंह व्यास, महेंद्रसिंह कच्छवाह, विरेंद्रसिंह कलचुरी, नितीन कच्छवाह, शुभम बघेल, विक्की बैस, राजेंद्रसिंह कच्छवाह आदींनी सहकार्य सकेले.