शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

कौशलयुक्त जिल्हा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:27 IST

महाराष्ट्र शासनाने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणात दिले आहे.

ठळक मुद्देरणजित पाटील : मोहाडीत कौशल्य विकास रोजगार मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : महाराष्ट्र शासनाने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणात दिले आहे. जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराला वाव असून भंडारा जिल्हा कौशलयुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी हे होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मोहाडी नगराध्यक्ष स्वाती लिमजे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक संचालक शैलेश भगत व विविध पदाधिकारी उपस्थित होते.ना.रणजित पाटील यांनी, जगातील इतर देशाच्या तुलनेत भारताकडे मानव संसाधन अधिक आहे. हे संसाधन कौशल्ययुक्त झाल्यास देश अधिक प्रगत होईल. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच कौशल्य विकास हे मंत्रालय सुरु केले. महाराष्ट्रात या मंत्रालयांतर्गत प्रशिक्षणाची योजना राबविली जात आहे. शिक्षणासोबतच प्रशिक्षण आवश्यक असून युवक - युवतींनी आपल्यामधील गुण व कौशल्य ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडावे. केवळ नौकरीच्या मागे न धावता कौशल्याच्या बळावर स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करा, असे प्रतिपादन त्यांनी केले.शासनाचा कौशल्य प्रशिक्षणावर मोठा भर असून व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना कौशल्य प्रशिक्षणाचा विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. मोहाडी नगर पंचायतने स्वच्छतेत चांगले कार्य करावे असे सांगून पाटील म्हणाले की, मोहाडीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. शासन निधी देईल. मात्र हा आराखडा सर्वंकश असावा.यावेळी बोलताना आमदार चरण वाघमारे यांनी, युवकांनी केवळ नौकरीच्या मागे न धावता रोजगार करण्यावर भर द्यावा. स्वत:च्या रोजगाराच्या संधी स्वत: निर्माण कराव्यात. या मेळाव्यात नौकरीची हमी न मिळाल्याने नाराज न होता स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा घेऊन जावे असे ते म्हणाले. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७००-८०० लोकांनी रक्तदान केले असून या क्षेत्रात ‘ब्लड आॅन कॉल’ योजना यशस्वी होत आहे. हा मेळावा युवकांनी स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणारा ठरेल असे ते म्हणाले.भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असून यावर आधारीत जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन प्रशासनाने तयार केल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. कृषी, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग व पशुसंवर्धन हा पंचसुत्री कार्यक्रम प्रशासन राबविणार आहे. या पंचसुत्रीमधून रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच पर्यटनाला वाव दिला जाणार असून युवकांनी या माध्यमातून रोजगारक्षम व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केले.यावेळी तारिक कुरैशी व प्रकाश बाळबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनुराधा पॅरामेडीकलच्या विद्यार्थिनींचा ना.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक शैलेश भगत यांनी केले. जिल्ह्यात सहा रोजगार मेळावे घेवून ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते. या मेळाव्यास युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे हस्ते करण्यात आले.