शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

उत्कृष्ट कार्याने सन्मानाचे मानकरी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:20 AM

मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार घनश्याम सोनकूसरे उपस्थित होते.

ठळक मुद्देनवनाथ कातकडे : मोहाडीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शासकीय कर्मचारी जनतेचे सेवक म्हणून सेवा करीत असतात. सेवानिवृत्तीनंतर कामाची पावती जनतेकडूनच मिळत असते. कर्मचाऱ्यांनी जनतेचे काम सामाजिक दृष्टीकोन ठेऊन काम केले पाहिजे. उत्कृष्ट काम आपल्या प्रदीर्घ कामाची पावती व सन्मान मिळवून देतो, असे प्रतिपादन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी केले .मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार घनश्याम सोनकूसरे उपस्थित होते. तलाठी जगदीश कढव, अशोक मेश्राम सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते करण्यास आला. नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे म्हणाले, सेवा करतांना आनंद वाटला पाहिजे. ताण यायला नको. समोर आलेल्या प्रकरणाचा अभ्यास केला पाहिजे तरच प्रशासकीय कामे सुलभ होतात. यावेळी सत्कारमूर्तींनी आपल्या सेवाकाळातले अनुभव कथन केले. संचालन रामनारायण धकाते यांनी केले. आभार प्रदर्शन अंकुश धांदे यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी मडामे, मिश्रा, सुरजुसे, तागडे, तलाठी मदनकर, समरीत, घोडेस्वार, पराग तीतीरमारे, देशभ्रतार, अव्वल कारकून धकाते, हेडावू, शिल्पा डोंगरे, कनिष्ठ लिपिक उमेश बारापात्रे, मानकर, अंकुश कावरे, सागर बावरे, कावळे, शिपाई सिद्धार्थ रामटेके, सव्वालाखे, हितेश शेंडे आदी उपस्थित होते.