शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वाईट प्रवृत्तींपासून सावध रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:05 IST

आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे.

ठळक मुद्देविनिता साहू : युवक व माध्यमांसाठी कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतभंडारा: आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे. अशा परिस्थितीत सायबर जगात चांगल्या व्यक्तीसोबत वाईट प्रवृत्तीसुध्दा सक्रीय आहेत. केवळ आर्थिकच नाही तर भावनिक, सामाजिक व नात्यांची फसवणूक सायबर क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात वावरतांना सायबर क्षेत्रातील वाईट प्रवृत्तीपासून सावध रहा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हयांविषयी जनजागृती या विषयावर युवक-युवती, माध्यम प्रतिनिधी व पालक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपअधिक्षक गृह सुनिल कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आयसीआयसी बँक व्यवस्थापक कमलेश वालदे व सायबर तज्ञ मुकेश कवटघरे, पोलीस निरिक्षक सुरेश धुसर, प्रमोद रहांगडाले उपस्थित होते.मोबाईलचा वापर करतांना आपण बºयाच वेळी काळजी घेत नाही. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे विनिता साहू यांनी सांगितले. व्हॉटअप्, व्टिटर, फेसबुक या सारख्या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, स्टेट्स टाकतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: महिला व मुलींनी या विषयी अधिक काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.समाज माध्यमावर वावरतांना अनोळखी माणसांपासून सावध राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमावर अनेक सायबर गुन्हेगार खोटे प्रोफाईल बनवून धोका देण्याचे काम करीत असतात त्यामुळे खात्री असल्याशिवाय कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका, असा सल्ला साहू यांनी दिला. सायबर क्षेत्रातील आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये इतर राज्यातील गुन्हेगार मोठया प्रमाणात असून अनोळखी कॉलला कुठलीही माहिती शेअर करु नका, असे त्या म्हणाल्या. इतरांसोबत घडलेला सायबर गुन्हा माझ्यासोबत घडणार नाही. ही धारणा न ठेवता सोशल मिडियाचा गैरवापर टाळा, खात्रीविना कोणतेही मॅसेज किंवा पोस्ट इतरांना प्रसारित करु नका. आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ डिलीट करा, आमिषाला बळी पडू नका असे सांगून सतत सजग रहा, सावध रहा व काळजीपूर्वक व्यवहार करा, असे आवाहन साहू यांनी केले.व्यवस्थापक कमलेश वालदे यांनी उपयुक्त माहिती दिली. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका, आपला गोपनीय डाटा शेअर करु नका, पासवर्ड व पीन कुणालाही देवू नका, बँक डिटेल्स देवू नका, एटीएम व्यवहार काळजीपूर्वक करा, असे ते म्हणाले.सायबर फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम याबाबत मुकेश कवटघरे यांनी मार्गदर्शन केले.