शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वाईट प्रवृत्तींपासून सावध रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:05 IST

आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे.

ठळक मुद्देविनिता साहू : युवक व माध्यमांसाठी कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतभंडारा: आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे. अशा परिस्थितीत सायबर जगात चांगल्या व्यक्तीसोबत वाईट प्रवृत्तीसुध्दा सक्रीय आहेत. केवळ आर्थिकच नाही तर भावनिक, सामाजिक व नात्यांची फसवणूक सायबर क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात वावरतांना सायबर क्षेत्रातील वाईट प्रवृत्तीपासून सावध रहा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हयांविषयी जनजागृती या विषयावर युवक-युवती, माध्यम प्रतिनिधी व पालक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपअधिक्षक गृह सुनिल कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आयसीआयसी बँक व्यवस्थापक कमलेश वालदे व सायबर तज्ञ मुकेश कवटघरे, पोलीस निरिक्षक सुरेश धुसर, प्रमोद रहांगडाले उपस्थित होते.मोबाईलचा वापर करतांना आपण बºयाच वेळी काळजी घेत नाही. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे विनिता साहू यांनी सांगितले. व्हॉटअप्, व्टिटर, फेसबुक या सारख्या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, स्टेट्स टाकतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: महिला व मुलींनी या विषयी अधिक काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.समाज माध्यमावर वावरतांना अनोळखी माणसांपासून सावध राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमावर अनेक सायबर गुन्हेगार खोटे प्रोफाईल बनवून धोका देण्याचे काम करीत असतात त्यामुळे खात्री असल्याशिवाय कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका, असा सल्ला साहू यांनी दिला. सायबर क्षेत्रातील आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये इतर राज्यातील गुन्हेगार मोठया प्रमाणात असून अनोळखी कॉलला कुठलीही माहिती शेअर करु नका, असे त्या म्हणाल्या. इतरांसोबत घडलेला सायबर गुन्हा माझ्यासोबत घडणार नाही. ही धारणा न ठेवता सोशल मिडियाचा गैरवापर टाळा, खात्रीविना कोणतेही मॅसेज किंवा पोस्ट इतरांना प्रसारित करु नका. आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ डिलीट करा, आमिषाला बळी पडू नका असे सांगून सतत सजग रहा, सावध रहा व काळजीपूर्वक व्यवहार करा, असे आवाहन साहू यांनी केले.व्यवस्थापक कमलेश वालदे यांनी उपयुक्त माहिती दिली. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका, आपला गोपनीय डाटा शेअर करु नका, पासवर्ड व पीन कुणालाही देवू नका, बँक डिटेल्स देवू नका, एटीएम व्यवहार काळजीपूर्वक करा, असे ते म्हणाले.सायबर फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम याबाबत मुकेश कवटघरे यांनी मार्गदर्शन केले.