शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सावधान रोहयोच्या कामांची घाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी शासकीय कर्मचारी वर्गातून होत आहे. ...

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी शासकीय कर्मचारी वर्गातून होत आहे. भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाच्या व भंडारा पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका लिपिकालाही कोरोनामुळे आपला कर्तव्यावर असताना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्वीप्रमाणे परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत तरी रोहयो कामे सुरूच करू नयेत, अशी मागणी रोहयो विभागांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी करू लागले आहेत.

एका रोजगार सेवकामुळे अनेक जण पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाला, एका पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका लिपिकालाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने कर्मचारी वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काही दिवस रोहयो कामांना स्थगिती देण्याची मागणी आता गावागावांतून होऊ लागली आहे.

बॉक्स

रोहयो कामांवर सुविधा मिळणे अशक्यच

रोहयोची कामे सुरू केल्यास ही कामे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र ठरू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आणखी आकडा वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. रुग्णालयात तसेच लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत आहे. ग्रामीणमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आकडा रोखायचा असेल, तर किमान आणखी काही दिवस तरी प्रशासनाने रोहयो कामांना स्थगिती देण्याची गरज आहे.

बॉक्स

प्रशासन जबाबदारी घेणार काय

शासनाने अद्यापही जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी व इतर काही निमशासकीय कर्मचारी, सर्वच वयोगटातील नागरिकांना अद्याप कोरोनाचे लसीकरण केले नाही. अद्यापही कृषी विभागाचे कर्मचारी, शिक्षकांना, रोजगार सेवकांना कोरोना संकटात विमा सुरक्षा कवच दिलेले नाही. त्यामुळे रोहयोची कामे करताना जिल्ह्यात एखाद्या मजुराचा, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास जिल्हा प्रशासन त्याची जबाबदारी घेणार काय, असा प्रश्न ग्रामसेवक, कृषी सहायक, पंचायत समितीचे कार्यरत अधिकारी, कर्मचारी, रोजगार सेवक विचारत आहेत. रोहयो कामांमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.