शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:02 IST

बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची पाठ : २५ वर्षात पहिल्यांदाच असे चित्र

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे यंदा बावनथडी प्रकल्प कोरडा तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुमसर-मोहाडी व मध्यप्रदेशाला वरदान ठरणारा बावनथडी (राजीवसागर) धरणात पावसाळ्यातही मृतसाठाच असल्याची धक्कादायक माहिती आहे. धरणक्षेत्र तथा बावनथडी नदी उगम परिसरात पुरेसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा झाला नाही. उपयुक्त साठ्यासाठी पुन्हा पाच सेंमी पातळी वाढण्याची आवश्यकत आहे. धरण क्षेत्रात केव्हा पाऊस बरसतो याची प्रतीक्षा शेतकरी तथा संबंधित अधिकारी वर्गाला आहे. गत २५ वर्षात बावनथडीला पावसाळ्यात पाणी नाही, असे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३३ वक्राकार दरवाजे उघडण्याची वेळ प्रकल्प प्रशासनावर आली आहे तर दुसरीकडे बावनथडी धरणात अद्यापही मृतसाठा आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर शेती सिंचनाची सोय एकट्या बावनथडी प्रकल्पावर पूर्ण होते. हा प्रकल्प पुर्णक्षमतेने भरला नाही तर भीषण स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.नदीजोड प्रकल्पाची गरजवैनगंगा व बावनथडी या दोन प्रमुख नद्या आहेत वैनगंगा नदीवर गोसेधरण बांधण्यात आले. प्रकल्पाचे बॅकवाटर भंडारा शहरापर्यंत येते. भर उन्हाळ्यातही येथील जलस्तर कमी होत नाही. दुसरीकडे बावनथडी नदी पावसाळा वगळला तर आठ ते दहा महिने कोरडीच राहते. त्यामुळे नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज आहे. नदीजवळ प्रकल्प राबविल्यास बावनथडी नदीतही बाराही महिने पाणी खळखळत राहू शकते. त्यामुळे नदीवर सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची.बावनथडी नदी कोरडी पडण्याची भीतीवैनगंगा नदीला बावनथडी नदी बपेराजवळ येवून मिळते. वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे बॅरेज तयार करण्यात आले आहे. वैनगंगा नदीला या हंगामात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु बावनथडी नदी मात्र कोरडीच असल्याचे चित्र आहे. पाऊस न बरसल्याने सर्वच जण हतबल झाले आहे. केवळ सिहोरा परिसरातील चांदपूर जलाशयातून पाणी विसर्ग करण्यात आले. आगामी काळात पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.बावनथडी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात मृतसाठा आहे. पाच सेंमीने पाणी पातळी वाढली तर उपयुक्त पाणीसाठा होईल. अद्याप येथे पावसाची प्रतीक्षा आहे.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प.नैसर्गीक संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमीची कामे करण्याची गरज आहे. पावसाअभावी शेती होणार नाही. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करावे.-डॉ. पंकज कारेमोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प