शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
4
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
5
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
6
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
7
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
8
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
9
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
10
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
11
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
12
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
13
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
14
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
15
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
16
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
17
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
18
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
19
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
20
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण

बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:02 IST

बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची पाठ : २५ वर्षात पहिल्यांदाच असे चित्र

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे यंदा बावनथडी प्रकल्प कोरडा तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुमसर-मोहाडी व मध्यप्रदेशाला वरदान ठरणारा बावनथडी (राजीवसागर) धरणात पावसाळ्यातही मृतसाठाच असल्याची धक्कादायक माहिती आहे. धरणक्षेत्र तथा बावनथडी नदी उगम परिसरात पुरेसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा झाला नाही. उपयुक्त साठ्यासाठी पुन्हा पाच सेंमी पातळी वाढण्याची आवश्यकत आहे. धरण क्षेत्रात केव्हा पाऊस बरसतो याची प्रतीक्षा शेतकरी तथा संबंधित अधिकारी वर्गाला आहे. गत २५ वर्षात बावनथडीला पावसाळ्यात पाणी नाही, असे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३३ वक्राकार दरवाजे उघडण्याची वेळ प्रकल्प प्रशासनावर आली आहे तर दुसरीकडे बावनथडी धरणात अद्यापही मृतसाठा आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर शेती सिंचनाची सोय एकट्या बावनथडी प्रकल्पावर पूर्ण होते. हा प्रकल्प पुर्णक्षमतेने भरला नाही तर भीषण स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.नदीजोड प्रकल्पाची गरजवैनगंगा व बावनथडी या दोन प्रमुख नद्या आहेत वैनगंगा नदीवर गोसेधरण बांधण्यात आले. प्रकल्पाचे बॅकवाटर भंडारा शहरापर्यंत येते. भर उन्हाळ्यातही येथील जलस्तर कमी होत नाही. दुसरीकडे बावनथडी नदी पावसाळा वगळला तर आठ ते दहा महिने कोरडीच राहते. त्यामुळे नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज आहे. नदीजवळ प्रकल्प राबविल्यास बावनथडी नदीतही बाराही महिने पाणी खळखळत राहू शकते. त्यामुळे नदीवर सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची.बावनथडी नदी कोरडी पडण्याची भीतीवैनगंगा नदीला बावनथडी नदी बपेराजवळ येवून मिळते. वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे बॅरेज तयार करण्यात आले आहे. वैनगंगा नदीला या हंगामात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु बावनथडी नदी मात्र कोरडीच असल्याचे चित्र आहे. पाऊस न बरसल्याने सर्वच जण हतबल झाले आहे. केवळ सिहोरा परिसरातील चांदपूर जलाशयातून पाणी विसर्ग करण्यात आले. आगामी काळात पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.बावनथडी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात मृतसाठा आहे. पाच सेंमीने पाणी पातळी वाढली तर उपयुक्त पाणीसाठा होईल. अद्याप येथे पावसाची प्रतीक्षा आहे.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प.नैसर्गीक संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमीची कामे करण्याची गरज आहे. पावसाअभावी शेती होणार नाही. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करावे.-डॉ. पंकज कारेमोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प