शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:02 IST

बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची पाठ : २५ वर्षात पहिल्यांदाच असे चित्र

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे यंदा बावनथडी प्रकल्प कोरडा तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुमसर-मोहाडी व मध्यप्रदेशाला वरदान ठरणारा बावनथडी (राजीवसागर) धरणात पावसाळ्यातही मृतसाठाच असल्याची धक्कादायक माहिती आहे. धरणक्षेत्र तथा बावनथडी नदी उगम परिसरात पुरेसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा झाला नाही. उपयुक्त साठ्यासाठी पुन्हा पाच सेंमी पातळी वाढण्याची आवश्यकत आहे. धरण क्षेत्रात केव्हा पाऊस बरसतो याची प्रतीक्षा शेतकरी तथा संबंधित अधिकारी वर्गाला आहे. गत २५ वर्षात बावनथडीला पावसाळ्यात पाणी नाही, असे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३३ वक्राकार दरवाजे उघडण्याची वेळ प्रकल्प प्रशासनावर आली आहे तर दुसरीकडे बावनथडी धरणात अद्यापही मृतसाठा आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर शेती सिंचनाची सोय एकट्या बावनथडी प्रकल्पावर पूर्ण होते. हा प्रकल्प पुर्णक्षमतेने भरला नाही तर भीषण स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.नदीजोड प्रकल्पाची गरजवैनगंगा व बावनथडी या दोन प्रमुख नद्या आहेत वैनगंगा नदीवर गोसेधरण बांधण्यात आले. प्रकल्पाचे बॅकवाटर भंडारा शहरापर्यंत येते. भर उन्हाळ्यातही येथील जलस्तर कमी होत नाही. दुसरीकडे बावनथडी नदी पावसाळा वगळला तर आठ ते दहा महिने कोरडीच राहते. त्यामुळे नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज आहे. नदीजवळ प्रकल्प राबविल्यास बावनथडी नदीतही बाराही महिने पाणी खळखळत राहू शकते. त्यामुळे नदीवर सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची.बावनथडी नदी कोरडी पडण्याची भीतीवैनगंगा नदीला बावनथडी नदी बपेराजवळ येवून मिळते. वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे बॅरेज तयार करण्यात आले आहे. वैनगंगा नदीला या हंगामात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु बावनथडी नदी मात्र कोरडीच असल्याचे चित्र आहे. पाऊस न बरसल्याने सर्वच जण हतबल झाले आहे. केवळ सिहोरा परिसरातील चांदपूर जलाशयातून पाणी विसर्ग करण्यात आले. आगामी काळात पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.बावनथडी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात मृतसाठा आहे. पाच सेंमीने पाणी पातळी वाढली तर उपयुक्त पाणीसाठा होईल. अद्याप येथे पावसाची प्रतीक्षा आहे.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प.नैसर्गीक संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमीची कामे करण्याची गरज आहे. पावसाअभावी शेती होणार नाही. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करावे.-डॉ. पंकज कारेमोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प