शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्प शाप की वरदान?

By admin | Updated: July 25, 2016 00:43 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे

शेतकऱ्यांचा प्रश्न : आष्टी कालव्याचे बांधकाम थंडबस्त्यातराहुल भुतांगे तुमसरसिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे. परंतु शासनाच्या अती दिरंगाई वृत्तीमुळे या योजना शेतकऱ्यांना अभिशाप ठरू लागल्या आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण आष्टी वितरिकेबाबद पहावयास मिळत आहेत.तालुक्यातील अती महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बावनथडी परियोजनेची ओळख आहे. परियोजनेत गळभरणी करून पाणी साठवण्याची प्रक्रिया गत तीन चार वर्षापूर्वी सुरु आहे. परंतु राजापूर वितरिकेचे काम सन २००१ पासून सुरु होवूनही अद्याप काम अर्धवटच आहे. त्याच स्थितीत आहे. बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून राजापूर वितरिका ही लेंडेझरी, आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी (बुज.), लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, राजापूर आदी गावांना नहरावाटे सिंचनाकरिता पाणी वाटपाचे काम करणारी आहे. परंतु अजूनपर्यंत नहर खोदकाम व नहर बांधकाम झालेच नसल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, राजापूर येथील शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून तर वंचित आहेतच. त्या उपरही मागील सात वर्षापासून नहराकरिता जमीन अधिग्रहण केली. त्या जमिनीलगत ३ मिटर रुंदीच्या व ३ मिटर खोल खड्डे खोदून अधिकची जागा हस्तगत केल्या गेली आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचल्याने शेतजमिनीचे भूस्खलन होणे सुरु आहे. त्यामुळे खड्याचे स्वरुप तर वाढलेच. परंतु ऊसाची शेतीही नष्ट होत आहे. यामध्ये आष्टी येथील शेतकरी मनीराम गौपाले, लक्ष्मण गौपाले, शत्रूघ्न गौपाले, रामप्रसाद गौपाले, श्रीराम मेश्राम, रुपचंद सोनवाने, शामराव झोळे आदी शेतकरी प्रभावित झाले आहेत. नहर गावाशेजारातून जात असल्यामुळे विभागामार्फत खड्डे खोदण्यात आले. या खड्यात गावातील छोटे मोठे मुलं पोहणे, खेळण्यासाठी उतरत असतात. तिथे कधीही जीवीत हानी होवू शकते. याकरिता खड्डे बुजविण्यात यावे,म्हणून विभागाचे अभियंता चौरागडे व नागपुरे यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु निवेदनाची साधी दखल घेण्याचे सौजन्यही विभागाने दाखविले नाही. उलट शेतकऱ्यांना कंत्राटदारामार्फत धमकावणे सुरुच आहे. लाभ, मोबदला देणे तर सोडाच शेतकऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने बावनथडी परियोजना आष्टीतील शेतकऱ्यांकरिता अभिशाप ठरू लागली आहे.