शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

बावनथडीचे पाणी अडविले; वैनगंगा कोरडीच

By admin | Updated: May 14, 2016 00:26 IST

पाणीपुरवठा योनजेच्या विहीरी कोरड्या पडल्याने तुमसर व तिरोडा तालुक्यातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती.

८.२० दलघमी पाणी प्रकल्पातून सोडले : वाहनीनंतर अनेक गावात पाणीटंचाईमोहन भोयर तुमसरपाणीपुरवठा योनजेच्या विहीरी कोरड्या पडल्याने तुमसर व तिरोडा तालुक्यातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. याकरिता बावनथडी धरणातून बावनथडी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदीवर वाहनी येथे बॅरेजवर पाणी अडविण्यात आले. बॅरेजनंतर वैनगंगेचे नदी पात्र कोरडे पडले आहे. वाहनी पुढील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बॅरेजमधून निदान पिण्याकरिता पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी, बपेरा परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. याकरिता आ. चरण वाघमारेसह इतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याची कारवाई पुर्ण करण्याच्या सुचना केल्या होत्या. दोन्ही राज्याच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. बावनथडी धरणातून ८ मे ते १० मे पर्यंत ८.२० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले होते. पाणीटंचाई ग्रस्त गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला हे पाणी बपेरा येथे वैनगंगा नदीत पोहोचले वाहनी मांडवी गावाजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासन व अदानी वीज समूहाचा संयुक्त प्रकल्पात हा पाणी बॅरेज अडविण्यात आला. अदानी वीज समूहाने या संपूर्ण पाण्याचे पैसे भरले आहेत. तिरोडा तालुक्यातील उपसा करणार आहे.वाहनी मांडवी नंतर बॅरेज पुढील वैनगंगा नदी कोरडी पडली आहे. वाहनी मांडवी ते रोहा-बेटाळापर्यंत सद्यस्थितीत नदी पात्रात पाणी नाही रेंगेपार जवळ नदीची धार बंद पडली आहे. बॅरेजमधून येथे किमान पिण्याच्या पाण्याकरिता पाणी सोडण्याची गरज आहे. शासनाच्या नियमानुसार नदीच्या पाण्यावर प्रथम हक्क पिण्याकरिता, शेती व शेवटी उद्योगाकरिता पाणी देण्याचा नियम आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाणीपुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत आहे. दुसरीकडे पशूंना ही पिण्याकरिता पाणी नाही. शासनाने येथे नियोजन करण्याची गरज आहे. रेंगेपार येथे नदीची धार बंद आहे. वाहनी मांडवी पुढील गावात पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाहनी मांडवी बॅरेजमधून पाणी सोडण्याची गरज आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येईल.-हिरालाल नागपुरे, गटनेता, पंचायत समिती, तुमसर.