शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बावनथडी नदीतील रपटा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

आंतरराज्य पूल नादुरुस्त असल्यामुळे तो यापूर्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरत्या रपटावरून दुचाकी, सायकल, ट्रॅक्टर व पायी ...

आंतरराज्य पूल नादुरुस्त असल्यामुळे तो यापूर्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरत्या रपटावरून दुचाकी, सायकल, ट्रॅक्टर व पायी ये-जा सुरू होती. रपटा वाहून गेल्यामुळे आता अखेरचा संपर्कही तुटला आहे. बावनथडी राजीव सागर आंतरराज्य प्रकल्पातून नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई व शेतातील पिकाकरिता पाण्याचा विसर्ग गुरुवारी करण्यात आला. त्यामुळे कोरडे नदीपात्र पुन्हा जलमय झाले. नाकाडोंगरी येथील आंतरराज्य पूल कमकुवत असल्यामुळे यापूर्वीच वाहतुकीकरिता बंद केला. त्यामुळे जड वाहतूक सोबतच लहान वाहनांची वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली होती. पुलाजवळून नदीपात्रात तात्पुरता कच्चा रपटा तयार करण्यात आला होता. त्यावरून मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील नदीकाठावरील गावातील नागरिक दुचाकी व सायकलने तथा पायी ये-जा करत होते; परंतु पाणी विसर्गामुळे हा तात्पुरता रपटा पाण्यात वाहून गेला. त्यामुळे आता नागरिकांची ये-जा पूर्णत: बंद पडली आहे.

दोन्ही राज्यांतील नदीकाठावरील गावातील नागरिकांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत. त्यामुळे त्यांचे दररोज ये-जा सुरू असते. तात्पुरता रपटा हा महत्त्वपूर्ण आधार होता. पाणी विसर्गमुळे तोसुद्धा अखेरचा रस्ता बंद झाला आहे. दोन्ही राज्य शासनाने येथे दखल घेऊन किमान हलक्या वाहनांकरिता पुलावरून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.

कोट

नाकाडोंगरी येथील आंतरराज्य पूल कमकुवत असल्यामुळे बंद करण्यात आला. पुलाजवळ असलेल्या रपटा पाण्याच्या विसर्गामुळे वाहून गेला. त्यामुळे बावनथडी पुलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मंजुरी देण्यात यावी.

शंकर राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस, तुमसर.