शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बावनथडी नदीतील रपटा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

आंतरराज्य पूल नादुरुस्त असल्यामुळे तो यापूर्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरत्या रपटावरून दुचाकी, सायकल, ट्रॅक्टर व पायी ...

आंतरराज्य पूल नादुरुस्त असल्यामुळे तो यापूर्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरत्या रपटावरून दुचाकी, सायकल, ट्रॅक्टर व पायी ये-जा सुरू होती. रपटा वाहून गेल्यामुळे आता अखेरचा संपर्कही तुटला आहे. बावनथडी राजीव सागर आंतरराज्य प्रकल्पातून नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई व शेतातील पिकाकरिता पाण्याचा विसर्ग गुरुवारी करण्यात आला. त्यामुळे कोरडे नदीपात्र पुन्हा जलमय झाले. नाकाडोंगरी येथील आंतरराज्य पूल कमकुवत असल्यामुळे यापूर्वीच वाहतुकीकरिता बंद केला. त्यामुळे जड वाहतूक सोबतच लहान वाहनांची वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली होती. पुलाजवळून नदीपात्रात तात्पुरता कच्चा रपटा तयार करण्यात आला होता. त्यावरून मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील नदीकाठावरील गावातील नागरिक दुचाकी व सायकलने तथा पायी ये-जा करत होते; परंतु पाणी विसर्गामुळे हा तात्पुरता रपटा पाण्यात वाहून गेला. त्यामुळे आता नागरिकांची ये-जा पूर्णत: बंद पडली आहे.

दोन्ही राज्यांतील नदीकाठावरील गावातील नागरिकांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत. त्यामुळे त्यांचे दररोज ये-जा सुरू असते. तात्पुरता रपटा हा महत्त्वपूर्ण आधार होता. पाणी विसर्गमुळे तोसुद्धा अखेरचा रस्ता बंद झाला आहे. दोन्ही राज्य शासनाने येथे दखल घेऊन किमान हलक्या वाहनांकरिता पुलावरून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.

कोट

नाकाडोंगरी येथील आंतरराज्य पूल कमकुवत असल्यामुळे बंद करण्यात आला. पुलाजवळ असलेल्या रपटा पाण्याच्या विसर्गामुळे वाहून गेला. त्यामुळे बावनथडी पुलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मंजुरी देण्यात यावी.

शंकर राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस, तुमसर.