शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

शिक्षणाच्या पायाभूतचा ‘पायाच’ डगमगला

By admin | Updated: October 8, 2015 00:21 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले.

लोकमत विशेषप्रशांत देसाई भंडाराविद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले. मात्र, सप्टेंबर महिना लोटूनही जिल्ह्यातील या पायाभूत चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे, सरलच्या कामात शिक्षक, निवडणुकांचे बीएलओ, शालार्थ अशा अनेक कामांत शिक्षकांना लावल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती थंडावली आहे. शिक्षण विभागाने पायाभूतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला असला तरी, सध्या त्यांचा पायाच डगमगल्याने ‘शिक्षणाच्या आयचा घो’ म्हणण्याचा प्रसंग पालकांवर ओढवला आहे.शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून नाविण्य उपक्रम सुरू करण्यात आले. बालभारतीच्या सहकार्यातून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधता यावी, यावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने, यावर्षीपासून शिक्षण विभागाने मागीलवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित पायाभूत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे ठरविले. ही चाचणी वर्षातून तीनवेळा घ्यायची आहे. पहिल्याच चाचणीला आॅक्टोबर महिना सुरु झाला असतानाही आणखी दोन चाचण्या केव्हा घेणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. महिनाभरावर दिवाळी आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची प्रथम सत्र परीक्षाही दिवाळीपूर्वी होणे आवश्यक आहे. अशातच शिक्षण विभागाच्या सरल, शालार्थ प्रणालीच्या कामात शिक्षक शाळेत न राहता, माहिती अद्ययावत करण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. अगोदरच जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातल्या त्यात, जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शिक्षकांना बीएलओची कामे सोपविण्यात येणार आहे. आरटीई कायद्याचा घोळ या बाबींमुळे शिक्षक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर चालला आहे. परिणामी त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.