शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणाच्या पायाभूतचा ‘पायाच’ डगमगला

By admin | Updated: October 8, 2015 00:21 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले.

लोकमत विशेषप्रशांत देसाई भंडाराविद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले. मात्र, सप्टेंबर महिना लोटूनही जिल्ह्यातील या पायाभूत चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे, सरलच्या कामात शिक्षक, निवडणुकांचे बीएलओ, शालार्थ अशा अनेक कामांत शिक्षकांना लावल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती थंडावली आहे. शिक्षण विभागाने पायाभूतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला असला तरी, सध्या त्यांचा पायाच डगमगल्याने ‘शिक्षणाच्या आयचा घो’ म्हणण्याचा प्रसंग पालकांवर ओढवला आहे.शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून नाविण्य उपक्रम सुरू करण्यात आले. बालभारतीच्या सहकार्यातून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधता यावी, यावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने, यावर्षीपासून शिक्षण विभागाने मागीलवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित पायाभूत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे ठरविले. ही चाचणी वर्षातून तीनवेळा घ्यायची आहे. पहिल्याच चाचणीला आॅक्टोबर महिना सुरु झाला असतानाही आणखी दोन चाचण्या केव्हा घेणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. महिनाभरावर दिवाळी आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची प्रथम सत्र परीक्षाही दिवाळीपूर्वी होणे आवश्यक आहे. अशातच शिक्षण विभागाच्या सरल, शालार्थ प्रणालीच्या कामात शिक्षक शाळेत न राहता, माहिती अद्ययावत करण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. अगोदरच जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातल्या त्यात, जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शिक्षकांना बीएलओची कामे सोपविण्यात येणार आहे. आरटीई कायद्याचा घोळ या बाबींमुळे शिक्षक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर चालला आहे. परिणामी त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.