शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

तंटामुक्त गाव मोहिमेत दारू ठरतेय अडसर

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे.

दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार : पोलीस यंत्रणेचे मात्र दुर्लक्षभंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गावांतील क्षुल्लक कारणातून होणारे तंटे संपुष्टात येऊन गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेता यावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत शासन तंटामुक्त गावांना लाखो रुपयांचे पुरस्कार देते. पण जिल्ह्यातील काही ठिकाणी वाहते दारूचे पाट या योजनेला अडसर ठरताना दिसतात. मद्यपिंच्या उच्छादाने तंटामुक्त समित्या हतबल झाल्यात. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिळावे म्हणून राज्य शासनाच्या गृह खात्याने १५ आॅगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या कार्यात पोलिसांचे सहकार्य अनिवार्य केले. पोलीस प्रशासनातील उणीवाही तंटामुक्त गाव मोहिमेचे काम पूढे नेण्यास मारक ठरताना दिसतात. पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यावर वा उणीव दूर केल्यास तंटामुक्त गाव मोहिमेची संकल्पना यशस्वी ठरणार आहे. ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारी दारू ही या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. भंडारा जिल्हयात दारूबंदी नाही. गावोगावी मद्यपिंचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊन फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत आहेत. असे असताना शासन स्तरावर दारूबंदीवर कठोर अंमलाकरिता प्रयत्न होताना दिसत नाही. काही ठिकाणी महिला, युवकांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. पण पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळत नसल्याने दारूविक्री अव्याहत सुरू आहे. परिणामी तंटे वाढून वातावरण खराब होताना दिसते. राज्य शासनाकडून २00७ पासून तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यात आजपर्यंत अनेक गावांत तंटामुक्त गाव समितीकडून चांगले कामही झाले; पण अनेक गावांत मद्यपिंमुळे भांडणे वाढताना दिसतात. दारूमुळे भांडणे सोडविताना अडसर निर्माण करीत असल्याचे दिसते. सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे मानसिकतेत बदल होत असून कुरापतीचे प्रकारही वाढले आहेत. या प्रकारामुळे गावातील भांडणे तंटामुक्त गाव समितीला सोडविणे कठीण होते आणि शेवटी प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. यामुळे समितीच्या कार्याला अपयश येते. यासाठी गावांतून दारू हद्दपार करणेच गरजेचे झाले आहे. पोलिसांचे सहकार्यही गरजेचेगावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना पोलिसांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे; पण तेच मदत करीत नसतील तर तंटे सुटणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय दारूबंदी महिला मंडळांनाही पोलिसांनी मदत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)