शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तंटामुक्त गाव मोहिमेत दारू ठरतेय अडसर

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे.

दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार : पोलीस यंत्रणेचे मात्र दुर्लक्षभंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गावांतील क्षुल्लक कारणातून होणारे तंटे संपुष्टात येऊन गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेता यावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत शासन तंटामुक्त गावांना लाखो रुपयांचे पुरस्कार देते. पण जिल्ह्यातील काही ठिकाणी वाहते दारूचे पाट या योजनेला अडसर ठरताना दिसतात. मद्यपिंच्या उच्छादाने तंटामुक्त समित्या हतबल झाल्यात. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिळावे म्हणून राज्य शासनाच्या गृह खात्याने १५ आॅगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या कार्यात पोलिसांचे सहकार्य अनिवार्य केले. पोलीस प्रशासनातील उणीवाही तंटामुक्त गाव मोहिमेचे काम पूढे नेण्यास मारक ठरताना दिसतात. पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यावर वा उणीव दूर केल्यास तंटामुक्त गाव मोहिमेची संकल्पना यशस्वी ठरणार आहे. ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारी दारू ही या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. भंडारा जिल्हयात दारूबंदी नाही. गावोगावी मद्यपिंचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊन फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत आहेत. असे असताना शासन स्तरावर दारूबंदीवर कठोर अंमलाकरिता प्रयत्न होताना दिसत नाही. काही ठिकाणी महिला, युवकांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. पण पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळत नसल्याने दारूविक्री अव्याहत सुरू आहे. परिणामी तंटे वाढून वातावरण खराब होताना दिसते. राज्य शासनाकडून २00७ पासून तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यात आजपर्यंत अनेक गावांत तंटामुक्त गाव समितीकडून चांगले कामही झाले; पण अनेक गावांत मद्यपिंमुळे भांडणे वाढताना दिसतात. दारूमुळे भांडणे सोडविताना अडसर निर्माण करीत असल्याचे दिसते. सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे मानसिकतेत बदल होत असून कुरापतीचे प्रकारही वाढले आहेत. या प्रकारामुळे गावातील भांडणे तंटामुक्त गाव समितीला सोडविणे कठीण होते आणि शेवटी प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. यामुळे समितीच्या कार्याला अपयश येते. यासाठी गावांतून दारू हद्दपार करणेच गरजेचे झाले आहे. पोलिसांचे सहकार्यही गरजेचेगावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना पोलिसांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे; पण तेच मदत करीत नसतील तर तंटे सुटणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय दारूबंदी महिला मंडळांनाही पोलिसांनी मदत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)