शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव मोहिमेत दारू ठरतेय अडसर

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे.

दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार : पोलीस यंत्रणेचे मात्र दुर्लक्षभंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गावांतील क्षुल्लक कारणातून होणारे तंटे संपुष्टात येऊन गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेता यावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत शासन तंटामुक्त गावांना लाखो रुपयांचे पुरस्कार देते. पण जिल्ह्यातील काही ठिकाणी वाहते दारूचे पाट या योजनेला अडसर ठरताना दिसतात. मद्यपिंच्या उच्छादाने तंटामुक्त समित्या हतबल झाल्यात. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिळावे म्हणून राज्य शासनाच्या गृह खात्याने १५ आॅगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या कार्यात पोलिसांचे सहकार्य अनिवार्य केले. पोलीस प्रशासनातील उणीवाही तंटामुक्त गाव मोहिमेचे काम पूढे नेण्यास मारक ठरताना दिसतात. पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यावर वा उणीव दूर केल्यास तंटामुक्त गाव मोहिमेची संकल्पना यशस्वी ठरणार आहे. ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारी दारू ही या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. भंडारा जिल्हयात दारूबंदी नाही. गावोगावी मद्यपिंचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊन फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत आहेत. असे असताना शासन स्तरावर दारूबंदीवर कठोर अंमलाकरिता प्रयत्न होताना दिसत नाही. काही ठिकाणी महिला, युवकांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. पण पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळत नसल्याने दारूविक्री अव्याहत सुरू आहे. परिणामी तंटे वाढून वातावरण खराब होताना दिसते. राज्य शासनाकडून २00७ पासून तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यात आजपर्यंत अनेक गावांत तंटामुक्त गाव समितीकडून चांगले कामही झाले; पण अनेक गावांत मद्यपिंमुळे भांडणे वाढताना दिसतात. दारूमुळे भांडणे सोडविताना अडसर निर्माण करीत असल्याचे दिसते. सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे मानसिकतेत बदल होत असून कुरापतीचे प्रकारही वाढले आहेत. या प्रकारामुळे गावातील भांडणे तंटामुक्त गाव समितीला सोडविणे कठीण होते आणि शेवटी प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. यामुळे समितीच्या कार्याला अपयश येते. यासाठी गावांतून दारू हद्दपार करणेच गरजेचे झाले आहे. पोलिसांचे सहकार्यही गरजेचेगावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना पोलिसांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे; पण तेच मदत करीत नसतील तर तंटे सुटणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय दारूबंदी महिला मंडळांनाही पोलिसांनी मदत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)