शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

बल्लारपूर पेपर मिल बंद होणार नाही

By admin | Updated: March 30, 2015 00:47 IST

येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले.

बल्लारपूर: येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले. मात्र शहरातील कामगारांवर यामुळे संकट ओढावणार आहे. याचा विपरित परिणाम व्यापारी वर्गावरही होणार आहे. कोणत्याही परिस्थिती उद्योग बंद होऊ नये, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत ज्येष्ठ भाजपा नेते चंदनसिंह चंदेल यांनी दिली.राज्यात भाजपासह महायुतीचे सरकार आहे. सरकारने प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर बंदीचे हत्यार उपसले आहे. यात पेपर मिल उद्योगाचा समावेश आहे. या प्रकारामुळे कामगारात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन व्यथा मांडली. कामगारांना आश्वासन देताना, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर मिल बंद होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.शहराची आर्थिक व्यवस्था बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लि. वर अवलंबून आहे. उद्योग बंद झाल्यास कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. प्रदूषण होत असल्याच्या कारणावरुन उद्योगाला टाळे लावले ही बाब योग्य नाही. दंडात्मक कारवाई त्यावर उपाय आहे. मात्र सरसकट उद्योग बंदीचा निर्णय कामगारांच्या जीवावर उठणार आहे. येथील कामगारावर अन्याय होऊ देणार नाही, असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्यासह अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, सतविंदर सिंहदारी, काशिनाथ सिंह, राजू गुंडेटी, विजयसिं ठाकूर यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)