शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

बल्लारपूर पेपर मिल बंद होणार नाही

By admin | Updated: March 30, 2015 00:47 IST

येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले.

बल्लारपूर: येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले. मात्र शहरातील कामगारांवर यामुळे संकट ओढावणार आहे. याचा विपरित परिणाम व्यापारी वर्गावरही होणार आहे. कोणत्याही परिस्थिती उद्योग बंद होऊ नये, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत ज्येष्ठ भाजपा नेते चंदनसिंह चंदेल यांनी दिली.राज्यात भाजपासह महायुतीचे सरकार आहे. सरकारने प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर बंदीचे हत्यार उपसले आहे. यात पेपर मिल उद्योगाचा समावेश आहे. या प्रकारामुळे कामगारात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन व्यथा मांडली. कामगारांना आश्वासन देताना, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर मिल बंद होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.शहराची आर्थिक व्यवस्था बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लि. वर अवलंबून आहे. उद्योग बंद झाल्यास कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. प्रदूषण होत असल्याच्या कारणावरुन उद्योगाला टाळे लावले ही बाब योग्य नाही. दंडात्मक कारवाई त्यावर उपाय आहे. मात्र सरसकट उद्योग बंदीचा निर्णय कामगारांच्या जीवावर उठणार आहे. येथील कामगारावर अन्याय होऊ देणार नाही, असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्यासह अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, सतविंदर सिंहदारी, काशिनाथ सिंह, राजू गुंडेटी, विजयसिं ठाकूर यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)