शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

तहसील कार्यालयावर ‘बैलबंडी मोर्चा’

By admin | Updated: November 6, 2014 22:50 IST

सततच्या नापिकीमुळे आधीच मोडकडीस आलेल्या शेतकऱ्यांना नवसंजिवनी मिळावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी या अन्य मागण्यांसाठी बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या

अड्याळ : सततच्या नापिकीमुळे आधीच मोडकडीस आलेल्या शेतकऱ्यांना नवसंजिवनी मिळावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी या अन्य मागण्यांसाठी बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अड्याळ परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी व त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलून तातडीने मदतीचा हात द्यावा व प्रत्येक शेतकऱ्यांना १०० टक्के नापिकीची घोषणा करून १०० टक्के नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, कमी पावसामुळे करपलेल्या धानाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक २२ हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांचे पीक गेले त्यांना शासनाकडून मोफत बियाणे देण्यात यावे, नेरला उपसा सिंचन योजना त्वरीत चालू करण्यात यावी, गावस्तरावर दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी देण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांकडे पंप आहे अशा शेतकऱ्यांचे विद्युत बील माफ करावे व भारनियमन बंद करण्यात यावे, अड्याळ परिसरात ३0 ते ३५ टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यांचेही सर्व्हे करण्यात यावे अशा सर्व मागण्या घेऊन शिवसेनेच्या वतीने दुपारी १२ वाजता नायब तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना व परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार वाकलेकर तसेच आ. अवसरे यांना निवेदन दिले. आ. अवसरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश मानापुरे, तालुका अध्यक्ष विजय काटेखाये, राजेंद्र ब्राम्हणकर, गिरधर कोहपरे, निवृत्ती गभणे, भोजराज गभणे, मधुकर गभणे व परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते. यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर झाँकी मोर्चा दरम्यान काढली होती. कायदा व सुव्यवस्था प्रस्तापित राखण्यासाठी ठाणेदार नेवारे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. नायब तहसीलदारांना निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाची रितसर सांगता करण्यात आली. (वार्ताहर)