शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे.  २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे.

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असताना त्यात अंतर्भूत असलेल्या बाबींकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे आता उघड झाले आहे. गोसेच्या बॅकवॉटरचा फटका भंडारा शहराला बसत असून, सुरक्षा भिंतीच्या सदोष नियोजन असल्याचे समोर आले आहे. योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे. २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भंडारा शहराला बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून दीड दशकापूर्वी भंडारा शहराच्या सभोवताल सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते त्यावेळी सुरू झालेले बांधकाम सदोष नियोजनामुळे पूर्ण झाले नाही. आता १ नोव्हेंबर २०२१ पासून वैनगंगा नदीचा जलस्त्रोतात सातत्याने वाढत आहे.ठराविक मर्यादेपर्यंत पाण्याची पातळी वाढविण्यात येत असल्याने पूर्व मध्य भागातील वस्तीमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अंडरग्राउंड बोगद्यातून बॅकवॉटर ग्रामसेवक कॉलनी ते भंडारा-वरठीपर्यंतच्या शिवारात साचले जात आहे. एकीकडे काेट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन सुरक्षाभिंत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे आता चक्क नागरिकांच्या जीवाशीच खेळ सुरु आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोट्यवधीचा चुराडा- शहराच्या सभोवताल ते पिंडकेपारपर्यंत असा एकूण दहा किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा या प्रस्तावित बांधकामाची किंमत जवळपास ९० कोटींच्या घरात होते. या भिंतीचे बांधकाम दशकभारपेक्षा जास्त कालावधीपासून पूर्णतः थांबले आहे. खऱ्या अर्थाने  भिंतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर तर शहरात शिरलेत यासोबतच असंख्य समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. ९० कोटींचे बांधकाम आता २०० कोटींच्या वर पोहोचले असताना कोट्यवधींचा चुराडा करून उपयोग काय? असेही नागरिक बोलू लागले आहेत.  

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प