शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे.  २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे.

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असताना त्यात अंतर्भूत असलेल्या बाबींकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे आता उघड झाले आहे. गोसेच्या बॅकवॉटरचा फटका भंडारा शहराला बसत असून, सुरक्षा भिंतीच्या सदोष नियोजन असल्याचे समोर आले आहे. योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे. २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भंडारा शहराला बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून दीड दशकापूर्वी भंडारा शहराच्या सभोवताल सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते त्यावेळी सुरू झालेले बांधकाम सदोष नियोजनामुळे पूर्ण झाले नाही. आता १ नोव्हेंबर २०२१ पासून वैनगंगा नदीचा जलस्त्रोतात सातत्याने वाढत आहे.ठराविक मर्यादेपर्यंत पाण्याची पातळी वाढविण्यात येत असल्याने पूर्व मध्य भागातील वस्तीमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अंडरग्राउंड बोगद्यातून बॅकवॉटर ग्रामसेवक कॉलनी ते भंडारा-वरठीपर्यंतच्या शिवारात साचले जात आहे. एकीकडे काेट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन सुरक्षाभिंत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे आता चक्क नागरिकांच्या जीवाशीच खेळ सुरु आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोट्यवधीचा चुराडा- शहराच्या सभोवताल ते पिंडकेपारपर्यंत असा एकूण दहा किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा या प्रस्तावित बांधकामाची किंमत जवळपास ९० कोटींच्या घरात होते. या भिंतीचे बांधकाम दशकभारपेक्षा जास्त कालावधीपासून पूर्णतः थांबले आहे. खऱ्या अर्थाने  भिंतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर तर शहरात शिरलेत यासोबतच असंख्य समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. ९० कोटींचे बांधकाम आता २०० कोटींच्या वर पोहोचले असताना कोट्यवधींचा चुराडा करून उपयोग काय? असेही नागरिक बोलू लागले आहेत.  

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प