शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाबासाहेबांचे विचार अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:59 IST

माणसाने स्वत: विचार केला तर एक व्यक्ती हा सर्व समाजात समानता निर्माण करू शकतो, एवढी शक्ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. परिणामी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन ते आचरणात आणले पाहिजे,

ठळक मुद्देरवींद्र जगताप : स्मारक समितीतर्फे अभिवादन सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माणसाने स्वत: विचार केला तर एक व्यक्ती हा सर्व समाजात समानता निर्माण करू शकतो, एवढी शक्ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. परिणामी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन ते आचरणात आणले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती त्रिमूर्ती चौक भंडारा येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष वसंतराव हुमणे होते. प्रमुख अतिथी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप , प्रा. डॉ. सच्छिदानंद फुलेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, अविनाश कोटांगले, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके, प्रा. डॉ. जगजिवन कोटांगले, डॉ. विनोद भोयर, विनोद मेश्राम, सुर्यकांत हुमणे, इंजि. कांबळे आदी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्रिशरण पंचशील याचे सामुदायीकरित्या वंदना करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रा. डॉ. जगजीवन कोटांगले यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात तीन घटना महत्वाचे असुन त्या म्हणजे स्वातंत्र दिवस, प्रजासत्ताक दिवस व धम्म चक्र परिवर्तनदिवस ह्या मानवी कल्याणासाठी कशा महत्वपूर्ण घटना आहे याचे वर्णन केले. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणविर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोंबर १९५६ ला आम्हाला बौध्द धम्माची दिक्षा देवून अनिष्ठ रुढी परंपरेच्या चिखलातून बाहेर काढून सन्मानाचे एक नवे जिवन दिले. तसेच ज्या ज्या देशात भगवान बुध्दाला मानणाारे लोक आहे, त्या देशाची आजवर प्रगती झाली कारण बुध्दाचा धम्म हा विज्ञानवादी धम्म असुन सत्य व शांततेचा पाईक आहे. महेंद्र गडकरी म्हणाले, बाबासाहेबांनी भरकटलेल्या लोकांना माणुसपण आणण्याकरिता धम्मक्रांती घडवून आणली व ही धम्मक्रांती भारताच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरली. प्राचार्य डॉ. सच्छिदानंद फुलेकर यांनी धम्मचक्र परिवर्तन दिवसाचे महत्व विषद केले व मेडीटेशनवर बोलताना म्हणाले की मेडीटेशन हे बुध्दकालीन आहे व बुध्दाने योग हे प्रथमत: जगाला शिकविले. म्हणूनच आज जगात योगाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. शिक्षणाधिकारी पाच्छापुरे म्हणाले की, प्रज्ञा, शिल, करुणा माणसाने आत्मसात करुन आचरणात आणल्याशिवाय कोणालाही बाबासाहेब कळणार नाही. डॉ. विनोद भोयर यांनी समता स्वातंत्र न्याय हक्क हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. म्हणूनच बाबासाहेबांनी भगवान बुध्दाचा धम्म स्विकारुन आपल्या जनतेस त्याची दिक्षा दिली. युवराज उके म्हणाले की, मानवाची प्रतिष्ठा हेच मानवाचे जिवमुल्य आहे.अध्यक्ष वसंत हुमणे यांनी सर्व जनतेस धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या शुभेच्छा देवून सर्व जनतेने बाबासाहेब व बुध्दाच्या प्रतिज्ञाने पालन करुन आदर्श समाज घळवावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन स्वयंम सहायता महिला बचत गटाच्या महिलांनी जनतेला भोजनदान दिले.प्रस्तावना व संचालन समिती कोषाध्यक्ष महेंद्र वाहाणे यांनी केले तर आभार बी.सी. गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सचिव एम. आर. राऊत, एस. के. भादुळी, मदन बागळे, यशवंत नंदेवर, सुनिल धारगावे, प्रा. रमेश जांगळे, टी.के. नंदागवळी, कैलाश टेंभुर्णे, घुसा मेश्राम, अशित बागडे, निर्मला गोस्वामी आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर