शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

देव्हाडी उड्डाणपुलाला तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:37 IST

तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाणपुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जड वाहतूक सुरू ...

तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाणपुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जड वाहतूक सुरू झाल्यानंतरच या पुलाची चाचणी पूर्ण होणार आहे. मुंबई येथील तज्ज्ञांचा अहवाल अजून संबंधित विभागाला मिळाला नाही अशी माहिती आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या पुलावरून जड वाहतूक सुरू करण्याच्या निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती आहे.

मुंबई हावडा रेल्वे मार्गावर येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रेल्वेचे काम पूर्ण झाले त्यामुळे सदर पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु जड वाहतुकीला अजूनही येथे हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यामुळे जड वाहतूक तेथून पर्यायी मार्गाने सुरू आहे. सदर पुलावरून जड वाहतूक सुरू झाल्यानंतरच या पुलाची चाचणी पूर्ण होणार आहे त्यामुळे संबंधित विभाग जड वाहतूक सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा: देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल हा दगडांचा असून त्यात भरावात राख घालण्यात आली होती. मागील तीन वर्षापासून राख पुलातून वाहून गेली. त्यानंतर येथील कंत्राटदाराने पडलेल्या खड्ड्यात राख व इतर साहित्य घालून ते बुजविले. परंतु राख किती प्रमाणात वाहून गेली त्याच्या होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने दिल्ली व मुंबईच्या तज्ञांना येथे बोलाविले होते. यापूर्वी दिल्लीचे पथक येथे तपासणी करून गेले. त्यानंतर मुंबईचे तज्ज्ञांचे पथक येथे येऊन त्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली. त्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने नागपूर येथे अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांची भेट घेऊन पूलाविषयी संपूर्ण माहिती दिली. मुंबई येथील तज्ज्ञांच्या पथकाच्या अहवालाची येथे आता प्रतीक्षा आहे.

४० कोटीचा पुल:

देव्हाडी येथील उड्डाणपूल बांधकामाकरिता ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले त्यापैकी राज्य शासनाने २५ कोटी व रेल्वेने १४ कोटींचा निधी दिला तर राज्य शासनाने २३ कोटी रुपये दिले असून दोन कोटी रुपये कंत्राटदाराचे शिल्लक ठेवण्यात आले आहे.

पुलावर अंधाराचे साम्राज्य:

उड्डाणपूल बांधकाम करताना राज्य शासनातर्फे ३० फूट अंतरावर वीज खांब लावण्याची सुविधा करण्यात आली आहे. नियमानुसार सदर विजेचे बिल हे संबंधित ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे एवढा निधी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे उड्डाणपुलावरील विजेचे बिल कोण भरणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. सध्या उड्डाणपुलावर अंधाराचे साम्राज्य आहे हा पूल सुमारे एक किलोमीटर लांब आहे.