शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST

पालांदूर : भंडारा जिल्ह्याला खनिज क्षेत्रात अव्वल ठरविणाऱ्या रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अवैध ...

पालांदूर : भंडारा जिल्ह्याला खनिज क्षेत्रात अव्वल ठरविणाऱ्या रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अवैध उत्खननाला संधी मिळात आहे. जिल्हाभर संधीचे सोने रेती तस्कर होत आहेत. आता जिल्ह्यातील ५१ रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे कळते. काही जिल्ह्यांतील लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण करत खनिज संपत्ती मुबलकता दिलेली आहे. या नैसर्गिक संपत्तीत रेती ही महत्त्वाची आहे. भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय-निमशासकीय बांधकामावर अवैधरितीने वाळूचा वापर सुरू आहे. शासन-प्रशासनाची अपेक्षित कारवाई दिसत नाही. जिल्ह्याबाहेर हजारो ब्रास रेतीचे वहन सुरूच आहे. भंडारा जिल्ह्यातील रेती घाटांचासुद्धा लिलाव व्हावा. या रेती घाटांतून मिळणाऱ्या उत्पन्नचा काही हिस्सा नदीकाठावरील गावांना देत त्या गावांचा चौफेर विकास साधण्याकरिता सहकार्य करावे, अशी उपेक्षा आहे.

पहिल्या टप्प्यात प्राथमिक माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील सूर, वैनगंगा, बावनथडी, चुलबंद नदीपात्रातील ५१ घाटांची लिलाव प्रक्रिया थेट तीन वर्षांकरिता निघाली. मात्र, नंतर पुन्हा तिला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे. लाखनी तालुक्यातील रेतीघाटपैकी केवळ तीनच रेतीघाटांना पहिल्या टप्प्यात स्थान मिळाल्याचे समजते. पळसगाव, मिरेगाव व भूगाव असे रेतीघाटचे नाव आहेत. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील वाकल, तई, धर्मापुरी, पाथरी, नरव्हा, मऱ्हेगाव या रेतीघाटांचा पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत समावेश नसल्याची माहिती आहे.

रेतीघाटांचा उपसा निर्देशित केलेल्या अभ्यासानुसार एक ते दीड मीटर खोली, लांबी-रूंदीचे नियोजन केलेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना गावपातळीवर नियोजन करून त्यांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रेती घाटाचे लिलाव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमाप रेती उपसा घडण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण घाट लिलावाची अमाप किंमत होय. त्यातील नियमांची जुळवाजुळव करत शाब्दिक खेळ करून अधिकाऱ्यांच्या मर्जीत येऊन लिलावधारक अमाप पैसे कमावतात. लांबी-रूंदी-खोली यांची मर्यादा उडवत रात्रंदिवस रेती उपसा करून खोऱ्याने पैसा कमवतात. कोट्यवधींच्या घरातील घाटांची किंमत निम्म्यावर आणणे व स्थानिक नागरिकांना न्याय देणे नितांत गरजेचे आहे.

चौकट

महाराष्ट्र शासनाच्यावतीने घरकुल योजनेत गोरगरिबांना सामावून घेण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. ‘ब’ यादीतील सर्वच लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे नियोजन केल्याचे पुढे आलेले आहे. या घरकुलाचा निधी जेमतेम आहे. अशा या गोरगरिबांच्या घरांना दोन ब्रास रेती मोफत देण्याचे शासनाचे धोरण ठरलेले आहे; परंतु गरिबांच्या घरांना सरसकट सगळ्यांनाच दोन ब्रास रेती मिळेनाशी झालेली आहे. लिलाव प्रक्रियेत घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती मोफत नियोजन करावे, अशी मागणी आहे.