शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शवविच्छेदनातून वाघांसह अनेक वन्यजीवांच्या मृत्यूचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:01 IST

एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाला की त्याच्या मृत्यूचे कारण शोधणे आव्हानात्मक काम असते. हे काम गेल्या २२ वर्षांपासून डाॅ.गुणवंत भडके करीत आहेत. मृत जनावरांच्या शारीरिक बदलावरुन मृत्यूचे कारण शोधले जाते. साप चावल्यास जखमेजवळ सूज येते. शरीरातील छिद्रातून रक्त बाहेर पडते. वीज करंट लागल्यास शरीरावर जळाल्याच्या खुणा असतात. त्वचा आतून पोळते. जीभ दातात फसलेली असते. नागपुड्यातून रक्त बाहेर पडते.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : वन आणि वन्यजीवांनी भंडारा जिल्हा समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे; मात्र शिकारी व अन्य कारणामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचे कारण शोधून शिकाऱ्यांना अटक करण्याचे मोठे दिव्य वनविभागापुढे असते. अशा अनेक प्रकरणांत लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ.गुणवंत भडके वनविभागाच्या मदतीला धावून येतात.  शवविच्छेदनातील तंत्रशुद्ध निदानामुळे शिकाऱ्यांना अटक करणे वनविभागाला सहज शक्य झाले. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात भंडारा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाला की त्याच्या मृत्यूचे कारण शोधणे आव्हानात्मक काम असते. हे काम गेल्या २२ वर्षांपासून डाॅ.गुणवंत भडके करीत आहेत. मृत जनावरांच्या शारीरिक बदलावरुन मृत्यूचे कारण शोधले जाते. साप चावल्यास जखमेजवळ सूज येते. शरीरातील छिद्रातून रक्त बाहेर पडते. वीज करंट लागल्यास शरीरावर जळाल्याच्या खुणा असतात. त्वचा आतून पोळते. जीभ दातात फसलेली असते. नागपुड्यातून रक्त बाहेर पडते. विषबाधा झाल्यास तोंड उघडे असते. फेसमिश्रीत रक्तस्त्राव सुरु असतो. डोळे बाहेर असतात. शरीरातून बाहेर पडणारी विष्ठाही पातळ असते. अशा अनेक लक्षणांवरून मृत्यूचे निदान केले जाते. त्यात डाॅ.गुणवंत भडके तज्ज्ञ मानले जातात. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही वन्यजीवाचा मृत्यू झाला की डॉ. भडके तेथे पोहोचतात. त्यांनी केलेल्या मृत्यू कारणांच्या निदानावरून वनविभाग तपासाची दिशा निश्चित करतात. त्यांच्या या कार्याचा शासनाच्या वतीने गौरवही करण्यात आला. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार दिला.

..अन् जमाव आला होता घरावर चालून- डाॅ. गुणवंत भडके २००६-०७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत होते. त्यावेळी तळोधी परिसरात एका नरभक्षक बिबट्याने १७ जणांचा प्राण घेतला होता. या वाघाला ठार मारण्याची परवानगी मिळाली आणि त्याला ठारही मारण्यात आले. या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डाॅ. भडके यांनी हा नरभक्षक वाघ नसल्याचे सांगितले; परंतु त्यांच्यावर कुणी विश्वासही ठेवत नव्हते. माध्यमातील बातम्यांनी खळबळ उडाली. वनअधिकारी नाक मुरडायचे. शेकडो लोकांचा जमाव घरावर चालूनही आला होता. मात्र, त्यानंतर आठच दिवसांत त्या नरभक्षक वाघाने पुन्हा एका मुलीचा बळी घेतला आणि डाॅ. भडके यांच्या अंदाजाला खरे ठरविले.

१३ वाघ व १०० बिबट्यांचे शवविच्छेदन - पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके यांचे वनविभागात आदराने नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या २२ वर्षांच्या कार्यकाळात १३ वाघ, १०० बिबटे, ५० हरीण, १५ रानगवे, १२ नीलगायी, ११ अस्वलांचे शवविच्छेदन केले. दोन आठवड्यांपूर्वी भंडारा येथील पलाडी येथे मृत्युमुखी पडलेल्या रुद्रा बी या वाघाचे शवविच्छेदनही त्यांनीच केले.

विविध पुरस्कार- डाॅ.गुणवंत भडके यांना २२ वर्षाच्या कार्यकाळात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विभागीय स्तरावरील उत्कृष्ट पशुधन विकास अधिकारी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. २०१६-१७ मध्ये प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर मानेगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला आयएसओ मानांकन मिळवून दिले.

 

टॅग्स :forest departmentवनविभागdoctorडॉक्टर