शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

पुरस्कार योजनेत घोळ करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST

भंडारा: केंद्र शासनाच्या असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण ...

भंडारा: केंद्र शासनाच्या असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची योग्य ती चौकशी करून प्रामाणिकपणे पुरस्कार प्रक्रिया व्हावी यासाठी राज्याला निर्देश द्यावे, अशा आशयाचे पत्र खा.सुनील मेंढे यांनी केंद्रीय पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर लिचडे यांनी खा. सुनील मेंढे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीच्या आधारे हे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तपासणीसाठी म्हणजे मानांकनासाठी राज्य शासनाचा एक चमू नांदेड येथून गावात आला होता. तपासणी झाल्यानंतर चमूकडून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुण नोंदविणे गरजेचे असते परंतु गुण नोंदविण्याआधीच संकेतस्थळावर ग्रामपंचायतीच्यापुढे गुण नोंदविले असल्याचे दिसून आले. पुरस्कार योजनेत योग्य ग्रामपंचायतीला वगळून मर्जीतील ग्रामपंचायतीला पुरस्कृत करण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचे तक्रारीत सरपंच लिचडे यांनी म्हटले होते.

दरम्यान या तक्रारीच्या आधारे खा. मेंढे यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तपासणी होण्यापूर्वीच संकेतस्थळावर ग्रामपंचायत मोहदुराच्या पुढे गुण कसे भरण्यात आले? हा गंभीर विषय असून त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या चमूला त्यात बदल करता आला नाही, असेही खा. मेंढे यांनी म्हटले आहे. हा प्रकार राष्ट्रीय स्तराच्या प्रकारात घोळ घालण्याचे संकेत देणारा आहे. राज्य शासन अपात्र पंचायतींना पुरस्कार देण्यासाठी आग्रही असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राज्य शासनाकडून होत असलेल्या या घाणेरड्या राजकारणाची स्वतः हस्तक्षेप करून चौकशी व्हावी व पुन्हा तपासणी होऊन योग्य ग्रामपंचायतींना पुरस्कृत केले जाईल यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी या पत्रातून खा. सुनील मेंढे यांनी केली आहे.