शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार योजनेत घोळ करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST

भंडारा: केंद्र शासनाच्या असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण ...

भंडारा: केंद्र शासनाच्या असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची योग्य ती चौकशी करून प्रामाणिकपणे पुरस्कार प्रक्रिया व्हावी यासाठी राज्याला निर्देश द्यावे, अशा आशयाचे पत्र खा.सुनील मेंढे यांनी केंद्रीय पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर लिचडे यांनी खा. सुनील मेंढे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीच्या आधारे हे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तपासणीसाठी म्हणजे मानांकनासाठी राज्य शासनाचा एक चमू नांदेड येथून गावात आला होता. तपासणी झाल्यानंतर चमूकडून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुण नोंदविणे गरजेचे असते परंतु गुण नोंदविण्याआधीच संकेतस्थळावर ग्रामपंचायतीच्यापुढे गुण नोंदविले असल्याचे दिसून आले. पुरस्कार योजनेत योग्य ग्रामपंचायतीला वगळून मर्जीतील ग्रामपंचायतीला पुरस्कृत करण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचे तक्रारीत सरपंच लिचडे यांनी म्हटले होते.

दरम्यान या तक्रारीच्या आधारे खा. मेंढे यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तपासणी होण्यापूर्वीच संकेतस्थळावर ग्रामपंचायत मोहदुराच्या पुढे गुण कसे भरण्यात आले? हा गंभीर विषय असून त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या चमूला त्यात बदल करता आला नाही, असेही खा. मेंढे यांनी म्हटले आहे. हा प्रकार राष्ट्रीय स्तराच्या प्रकारात घोळ घालण्याचे संकेत देणारा आहे. राज्य शासन अपात्र पंचायतींना पुरस्कार देण्यासाठी आग्रही असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राज्य शासनाकडून होत असलेल्या या घाणेरड्या राजकारणाची स्वतः हस्तक्षेप करून चौकशी व्हावी व पुन्हा तपासणी होऊन योग्य ग्रामपंचायतींना पुरस्कृत केले जाईल यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी या पत्रातून खा. सुनील मेंढे यांनी केली आहे.