शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आंधळगाव ते धुसाळा रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्यामुळे  रस्त्यावरील गिट्टी बाहेर निघाली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कमालीची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डागडुजीचे काम  करण्यात आले. परंतु रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित न केल्यामुळे गिट्टी व मुरूम बाहेर निघाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. बांधकाम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सेलोकर, देवा  पुडके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशील बोपचे, प्रवीण सेलोकर, गुरुदेव सेलोकर, अक्षय बोंद्रे, स्वप्नील सेलोकर, शामदादा कोसरे, भावेश निमकर, स्वप्नील वणवे, अंकित सेलोकर तसेच नवेगाव व धुसाळा येथील नागरिकांनी दिला आहे.

आमचा जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय?- माेहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव हा रस्ता रहदारीचा आहे. मात्र तरीही याकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यावर दुचाकी घसरुन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याने आमचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय? असा संतप्त सवाल धुसाळा, आंधळगावसह परिसरातील नागरिकांनी केला आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग