शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

अतिक्रमणाने घटले मामा तलावांचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:22 IST

सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.

ठळक मुद्देमोजणीच नाही : लिलावाची रक्कम संस्थेच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या मामा तलावांचा उपयोग मत्स्यपालनासाठी केला जात आहे. परंतु गत काही वर्षांपासून मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तलावाचे क्षेत्र घटले आहे. मात्र लिलाव करताना शासकीय दप्तरी असलेले क्षेत्रच ग्राह्य धरल्या जाते. परिणामी लिलाव घेणाऱ्या संस्था यामुळे आर्थिक अडचणीत येऊन लिलावाची रक्कम त्यांच्या मानगुटीवर बसत असल्याचे दिसत आहे.सिहोरा परिसरात जिल्हा परिषदेअंतर्गत मामा तलाव आहेत. या तलावांची लिलाव प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. तलाव लिलाव प्रक्रियेचा कालावधी १ जुलै ते ३० जून २०२४ असा आहे. प्रत्यक्षात तलाव लिलाव प्रक्रिया ३० जूनच्या आधी करण्याची गरज होती. या कालावधीत मत्स्य बिज उपलब्ध होत असल्याने मत्स्यपालन संस्थांनी दोन महिन्यांपासून ओरड सुरु केली. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा पहिला फटका मत्स्यपालन संस्थांना बसत आहे. उशिरा लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली असतानाही अनेक संस्थांनी लिलावात भाग घेतला. कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.दरम्यान सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.यात नोंद असणाºया हेक्टर आर क्षेत्रानुसार तलावाची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या क्षेत्रफळानुसार मत्स्यपालन संस्था, लिलावाची राशी जिल्हा परिषदेला अदा करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात निर्धारित क्षेत्रफळानुसार तलाव अस्तित्वातच नाहीत. तलावाचे अधिकार क्षेत्रात असणारी हेक्टर आर जागा अतिक्रमणात गेली आहे. प्रत्यक्ष नोंद असणाºया तलावाचे क्षेत्रफळ उपलब्ध नाही. ते आता परिणाम मत्स्यबिजांवर होणार आहे. ऐवढेच नाही तर कमी क्षेत्रफळासाठी जास्त रक्कम भरण्याचा फटकाही मत्स्यपालन संस्थांना सहन करावा लागत आहे.तलावांचा श्वास मोकळा कधी होणार?सिहोराच नव्हे तर जिल्ह्यातील मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. या तलावांचे अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत आहे. परंतु अद्यापपर्यंत कुणीही पुढाकार घेतला नाही. तलावांचे क्षेत्रफळ गेल्या कित्येक वर्षापासून मोजले नाही. या तलावांचा श्वास कधी मोकळा होणार असा प्रश्न मत्स्य पालन संस्था करीत आहेत.मत्स्य आयुक्तांनी मागितली माहितीजून महिन्यात पाण्याअभावी तलाव आणि नदीपात्रातील मासे आणि बोटकुलीचा मृत्यू झाला. वैनगंगा नदीवरील धापेवाडा धरणाच्या पाण्यात मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मत्स्य आयुक्तांनी मागविली आहे. त्यामुळे आता तलावांची माहिती गोळा केली जाणार आहे. या महिन्यात मत्स्यपालन संस्थांना आर्थिक फटका बसला आहे. या माहितीमुळे संस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.लिलावात काढण्यात आलेले तलावांचे क्षेत्रफळ प्रत्यक्षात नाही बहुतांश तलाव अतिक्रमणामुळे क्षेत्रफळात कमी आहे. त्यामुळे तलावांची मोजणी होणे गरजेचे आहे.-राजकुमार मोहनकर, मत्स्यपालन संस्था, मच्छेरा.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण