शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

अतिक्रमणाने घटले मामा तलावांचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:22 IST

सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.

ठळक मुद्देमोजणीच नाही : लिलावाची रक्कम संस्थेच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या मामा तलावांचा उपयोग मत्स्यपालनासाठी केला जात आहे. परंतु गत काही वर्षांपासून मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तलावाचे क्षेत्र घटले आहे. मात्र लिलाव करताना शासकीय दप्तरी असलेले क्षेत्रच ग्राह्य धरल्या जाते. परिणामी लिलाव घेणाऱ्या संस्था यामुळे आर्थिक अडचणीत येऊन लिलावाची रक्कम त्यांच्या मानगुटीवर बसत असल्याचे दिसत आहे.सिहोरा परिसरात जिल्हा परिषदेअंतर्गत मामा तलाव आहेत. या तलावांची लिलाव प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. तलाव लिलाव प्रक्रियेचा कालावधी १ जुलै ते ३० जून २०२४ असा आहे. प्रत्यक्षात तलाव लिलाव प्रक्रिया ३० जूनच्या आधी करण्याची गरज होती. या कालावधीत मत्स्य बिज उपलब्ध होत असल्याने मत्स्यपालन संस्थांनी दोन महिन्यांपासून ओरड सुरु केली. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा पहिला फटका मत्स्यपालन संस्थांना बसत आहे. उशिरा लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली असतानाही अनेक संस्थांनी लिलावात भाग घेतला. कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.दरम्यान सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.यात नोंद असणाºया हेक्टर आर क्षेत्रानुसार तलावाची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या क्षेत्रफळानुसार मत्स्यपालन संस्था, लिलावाची राशी जिल्हा परिषदेला अदा करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात निर्धारित क्षेत्रफळानुसार तलाव अस्तित्वातच नाहीत. तलावाचे अधिकार क्षेत्रात असणारी हेक्टर आर जागा अतिक्रमणात गेली आहे. प्रत्यक्ष नोंद असणाºया तलावाचे क्षेत्रफळ उपलब्ध नाही. ते आता परिणाम मत्स्यबिजांवर होणार आहे. ऐवढेच नाही तर कमी क्षेत्रफळासाठी जास्त रक्कम भरण्याचा फटकाही मत्स्यपालन संस्थांना सहन करावा लागत आहे.तलावांचा श्वास मोकळा कधी होणार?सिहोराच नव्हे तर जिल्ह्यातील मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. या तलावांचे अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत आहे. परंतु अद्यापपर्यंत कुणीही पुढाकार घेतला नाही. तलावांचे क्षेत्रफळ गेल्या कित्येक वर्षापासून मोजले नाही. या तलावांचा श्वास कधी मोकळा होणार असा प्रश्न मत्स्य पालन संस्था करीत आहेत.मत्स्य आयुक्तांनी मागितली माहितीजून महिन्यात पाण्याअभावी तलाव आणि नदीपात्रातील मासे आणि बोटकुलीचा मृत्यू झाला. वैनगंगा नदीवरील धापेवाडा धरणाच्या पाण्यात मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मत्स्य आयुक्तांनी मागविली आहे. त्यामुळे आता तलावांची माहिती गोळा केली जाणार आहे. या महिन्यात मत्स्यपालन संस्थांना आर्थिक फटका बसला आहे. या माहितीमुळे संस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.लिलावात काढण्यात आलेले तलावांचे क्षेत्रफळ प्रत्यक्षात नाही बहुतांश तलाव अतिक्रमणामुळे क्षेत्रफळात कमी आहे. त्यामुळे तलावांची मोजणी होणे गरजेचे आहे.-राजकुमार मोहनकर, मत्स्यपालन संस्था, मच्छेरा.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण