शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने घटले मामा तलावांचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:22 IST

सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.

ठळक मुद्देमोजणीच नाही : लिलावाची रक्कम संस्थेच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या मामा तलावांचा उपयोग मत्स्यपालनासाठी केला जात आहे. परंतु गत काही वर्षांपासून मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तलावाचे क्षेत्र घटले आहे. मात्र लिलाव करताना शासकीय दप्तरी असलेले क्षेत्रच ग्राह्य धरल्या जाते. परिणामी लिलाव घेणाऱ्या संस्था यामुळे आर्थिक अडचणीत येऊन लिलावाची रक्कम त्यांच्या मानगुटीवर बसत असल्याचे दिसत आहे.सिहोरा परिसरात जिल्हा परिषदेअंतर्गत मामा तलाव आहेत. या तलावांची लिलाव प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. तलाव लिलाव प्रक्रियेचा कालावधी १ जुलै ते ३० जून २०२४ असा आहे. प्रत्यक्षात तलाव लिलाव प्रक्रिया ३० जूनच्या आधी करण्याची गरज होती. या कालावधीत मत्स्य बिज उपलब्ध होत असल्याने मत्स्यपालन संस्थांनी दोन महिन्यांपासून ओरड सुरु केली. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा पहिला फटका मत्स्यपालन संस्थांना बसत आहे. उशिरा लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली असतानाही अनेक संस्थांनी लिलावात भाग घेतला. कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.दरम्यान सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.यात नोंद असणाºया हेक्टर आर क्षेत्रानुसार तलावाची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या क्षेत्रफळानुसार मत्स्यपालन संस्था, लिलावाची राशी जिल्हा परिषदेला अदा करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात निर्धारित क्षेत्रफळानुसार तलाव अस्तित्वातच नाहीत. तलावाचे अधिकार क्षेत्रात असणारी हेक्टर आर जागा अतिक्रमणात गेली आहे. प्रत्यक्ष नोंद असणाºया तलावाचे क्षेत्रफळ उपलब्ध नाही. ते आता परिणाम मत्स्यबिजांवर होणार आहे. ऐवढेच नाही तर कमी क्षेत्रफळासाठी जास्त रक्कम भरण्याचा फटकाही मत्स्यपालन संस्थांना सहन करावा लागत आहे.तलावांचा श्वास मोकळा कधी होणार?सिहोराच नव्हे तर जिल्ह्यातील मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. या तलावांचे अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत आहे. परंतु अद्यापपर्यंत कुणीही पुढाकार घेतला नाही. तलावांचे क्षेत्रफळ गेल्या कित्येक वर्षापासून मोजले नाही. या तलावांचा श्वास कधी मोकळा होणार असा प्रश्न मत्स्य पालन संस्था करीत आहेत.मत्स्य आयुक्तांनी मागितली माहितीजून महिन्यात पाण्याअभावी तलाव आणि नदीपात्रातील मासे आणि बोटकुलीचा मृत्यू झाला. वैनगंगा नदीवरील धापेवाडा धरणाच्या पाण्यात मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मत्स्य आयुक्तांनी मागविली आहे. त्यामुळे आता तलावांची माहिती गोळा केली जाणार आहे. या महिन्यात मत्स्यपालन संस्थांना आर्थिक फटका बसला आहे. या माहितीमुळे संस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.लिलावात काढण्यात आलेले तलावांचे क्षेत्रफळ प्रत्यक्षात नाही बहुतांश तलाव अतिक्रमणामुळे क्षेत्रफळात कमी आहे. त्यामुळे तलावांची मोजणी होणे गरजेचे आहे.-राजकुमार मोहनकर, मत्स्यपालन संस्था, मच्छेरा.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण