शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी शासकीय पाहुणचार घेत आहेत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:19 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनाना पटोलेंचा सवाल : २५ दिवसांपासून सात आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.२५ दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील रोहा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना काही रेती तसकरांनी पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. आता पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पोलिसांनाच सापडत नसतील तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? असा सवालही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भंडारा या शांत जिल्ह्यात कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओढवली आहे. या प्रकाराला राज्य सरकारचे गृहखातेच जबाबदार असून खतपाणी घालत आहे.एखाद्या घटनेचा गांभीर्याने शोध घेणाऱ्या भंडारा पोलिसांना हल्ला करणारे आरोपी कसे सापडू शकत नाही, हे आश्चर्यकारक म्हणावे असे आहे. या आरोपीमध्ये भाजपच्या पदाधिकाºयाचा समावेश आहे. एकीकडे गुंडांना पाठीशी घालत नाहीत, असे सांगणारे मुख्यमंत्री गुंड प्रवृत्तीच्या आरोपीना पाठिशी कसे घालत आहेत, असा प्रश्न करून भाजपात गुंडांना अभय असल्याचा आरोप केला आहे. मागील २५ दिवसापासून गंभीर गुन्ह्याचे हे आरोपी सापडत नसतील तर या घटनेला आणि आरोपींना गृहविभागच आश्रयदाते ठरत आहेत, असा गंभीर आरोपही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.चप्राड मंदिरातील दानपेटी चोरटे मोकाटचलाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीवर असलेल्या देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी घातलेले दान चोरट्यांनी नेले. परंतु पोलिसांना या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाही, चोरी, हल्ले असे प्रकार घडत असतानाही पोलिसाना आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे.