शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी शासकीय पाहुणचार घेत आहेत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:19 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनाना पटोलेंचा सवाल : २५ दिवसांपासून सात आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.२५ दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील रोहा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना काही रेती तसकरांनी पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. आता पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पोलिसांनाच सापडत नसतील तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? असा सवालही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भंडारा या शांत जिल्ह्यात कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओढवली आहे. या प्रकाराला राज्य सरकारचे गृहखातेच जबाबदार असून खतपाणी घालत आहे.एखाद्या घटनेचा गांभीर्याने शोध घेणाऱ्या भंडारा पोलिसांना हल्ला करणारे आरोपी कसे सापडू शकत नाही, हे आश्चर्यकारक म्हणावे असे आहे. या आरोपीमध्ये भाजपच्या पदाधिकाºयाचा समावेश आहे. एकीकडे गुंडांना पाठीशी घालत नाहीत, असे सांगणारे मुख्यमंत्री गुंड प्रवृत्तीच्या आरोपीना पाठिशी कसे घालत आहेत, असा प्रश्न करून भाजपात गुंडांना अभय असल्याचा आरोप केला आहे. मागील २५ दिवसापासून गंभीर गुन्ह्याचे हे आरोपी सापडत नसतील तर या घटनेला आणि आरोपींना गृहविभागच आश्रयदाते ठरत आहेत, असा गंभीर आरोपही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.चप्राड मंदिरातील दानपेटी चोरटे मोकाटचलाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीवर असलेल्या देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी घातलेले दान चोरट्यांनी नेले. परंतु पोलिसांना या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाही, चोरी, हल्ले असे प्रकार घडत असतानाही पोलिसाना आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे.