शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी शासकीय पाहुणचार घेत आहेत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:19 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनाना पटोलेंचा सवाल : २५ दिवसांपासून सात आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.२५ दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील रोहा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना काही रेती तसकरांनी पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. आता पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पोलिसांनाच सापडत नसतील तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? असा सवालही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भंडारा या शांत जिल्ह्यात कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओढवली आहे. या प्रकाराला राज्य सरकारचे गृहखातेच जबाबदार असून खतपाणी घालत आहे.एखाद्या घटनेचा गांभीर्याने शोध घेणाऱ्या भंडारा पोलिसांना हल्ला करणारे आरोपी कसे सापडू शकत नाही, हे आश्चर्यकारक म्हणावे असे आहे. या आरोपीमध्ये भाजपच्या पदाधिकाºयाचा समावेश आहे. एकीकडे गुंडांना पाठीशी घालत नाहीत, असे सांगणारे मुख्यमंत्री गुंड प्रवृत्तीच्या आरोपीना पाठिशी कसे घालत आहेत, असा प्रश्न करून भाजपात गुंडांना अभय असल्याचा आरोप केला आहे. मागील २५ दिवसापासून गंभीर गुन्ह्याचे हे आरोपी सापडत नसतील तर या घटनेला आणि आरोपींना गृहविभागच आश्रयदाते ठरत आहेत, असा गंभीर आरोपही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.चप्राड मंदिरातील दानपेटी चोरटे मोकाटचलाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीवर असलेल्या देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी घातलेले दान चोरट्यांनी नेले. परंतु पोलिसांना या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाही, चोरी, हल्ले असे प्रकार घडत असतानाही पोलिसाना आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे.