शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे हा या मागचा उद्देश असून जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे. 

ठळक मुद्देजल जीवन मिशन : आठ योजना सौरऊर्जेवर चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना व प्रत्येक घरी नळ या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. यातील आठ योजना सौरऊर्जेवर चालणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपवनसंरक्षक एस. एस. भलावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघमित्रा कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजय देशमुख, वरिष्ठ भु वैज्ञानिक शिवाजी पदमने, उपअभियंता यांत्रिकी नितीन पाटील, उपअभियंता दिनेश देवगडे, सहायक भु वैज्ञानिक व्ही. एम. मंत्री, जीवन प्राधिकारणाचे उपअभियंता डी. यू. तुरकर उपस्थित होते.जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे हा या मागचा उद्देश असून जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या गावात होणार योजना - भंडारा तालुक्यातील सालेहेटी २४ लाख ९८ हजार, सीतेपर २३ लाख ९८ हजार, लाखनी तालुक्यातील गोंदी २४ लाख २१ हजार, सानगाव १५ लाख ६५ हजार, सायगाव १६ लाख ८३ हजार, पवनी तालुक्यातील चन्नेवाडा २७ लाख ३० हजार, खैरी २६ लाख ८८ हजार, सुरेबोडी २० लाख ८९ हजार, कुर्झा २४  लाख ९८, लाखांदूर तालुक्यातील आसोला ६६ लाख ९ हजार, विरली बु. ६१लाख ७० हजार, मोहाडी तालुक्यातील खडकी ८७ लाख ६६ हजार, पांजरा बोथली ४१ लाख ७६ हजार, विहिरगाव ४६ लाख १२  हजार व तुमसर तालुक्यातील मेहेगाव ६० लाख ५५ हजार आणि पांजरा योजना ३० लाख ४७ हजार किमतीच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.७६३ गावांत प्रत्येक घरी नळ जोडणी - जिल्ह्यातील ७६३  गावात प्रत्येक घारी नळ जोडणी प्रस्तावित असून ३०२ गावात योजनेची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ५२ टक्के घरी नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित नळ तातडीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Waterपाणी