शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे तरुणांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:18 IST

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद : मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली आहे. १ जानेवारी २०१९ ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण होतात अशा सर्व व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत केले.उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यात सध्या ९ लाख ६० हजार ४४७ मतदार आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २ हजार २०० मृत मतदारांची नावे यादीतून कमी केली असून १० हजार नवीन नावांची नोंदणी झाली आहे.मतदानस्तरीय केंद्र अधिकाºयांनी घरोघरी जावून हे कार्य केले आहे. जिल्ह्यात ९ लाख ३२ हजार ६३४ मतदार हे छायाचित्र ओळखपत्र असलेले मतदार असून २७ हजार १६८ मतदारांकडे फोटो छायाचित्र ओळखपत्र नाही. अशा मतदारांना यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मतदार यादी दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून राजकीय पक्षांनी केंद्रस्तरीय एजंट नेमून जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.२०१९ ची निवडणूक दिव्यांग सुलभ निवडणूक म्हणून आयोगाने घोषित केली असून या नुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बनविले आहेत. सोबतच दिव्यांग व्यक्तीच्या सहकार्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येणाºया निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. या बाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रत्येक बुथस्तरावर व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.प्रारुप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर हा असणार आहे. दोन महिन्याचा हा कालावधी अतिशय महत्वाचा असून या काळात नव्याने मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण झाली अशा महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी महाविद्यालयात विशेष नोंदणी अभियान घेण्यात येणार आहे.अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया निरंतर असली तरी २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूका प्रस्तावित असल्यामुळे अद्यावत मतदार यादीसाठी जास्तीत जास्त नोंदणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होताच आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास मतदान केंद्र अधिकाºयाकडे अर्ज करुन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.