शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

किरकोळ विक्रेत्यांना आवाहन; १०० रुपयांत परवाना काढून निश्चिंत व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:24 IST

Bhandara : अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना नोंदणी घेण्याकरिता विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या किरकोळ विक्रेत्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्या व्यावसायिकांनी परवाना घेणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ अंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, अन्यथा पाच लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो.

ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. जे अन्न व्यावसायिक विनापरवाना, विनानोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतूद आहे, जे दुकानदार खराब पदार्थ ग्राहकांना देतात, त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्राहकांनीही घ्यावी काळजी• प्रत्येक खाद्यपदार्थांसमोर बेस्ट बिफोर लिहिले आहे किंवा नाही याची चौकशी ग्राहकांनी स्वतः करून घ्यायची आहे.• बेस्ट बिफोर लिहिले नसेल तर यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला तक्रार करता येईल. विकत घेत असलेले खाद्यपदार्थ ताजे आहे किंवा नाही, त्यात भेसळ असल्याचा संशय आल्यास तक्रार करावी.

दर्शनी भागात लावावे प्रमाणपत्र• अन्न परवाना प्रमाणपत्र दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात लावावे. जेणेकरून ते दुकान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारित असून, त्याची नोंदणी झाली आहे हे ग्राहकांना कळेल.

नोंदणीसाठी करा अर्जभंडारा जिल्ह्यातील अनेक किरकोळ व्यावसायिकांनी एफएसएसएएआयसाठी नोंदणी केली आहे. परंतु, ज्यांनी केली नाही, अशांना परवाना घेताना एफएसएसएएआय डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या व्यावसायिकांना नोंदणी आवश्यकअन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना नोंदणी घेण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, भाजीपाला, फळेविक्रेते, पावभाजी, पाणीपुरी विक्रेते, अंडे, मांस, मटन, विक्रेते, मासे विक्रेते तसेच उत्पादक यांनी त्वरित अन्न परवाना नोंदणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा