शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:56 IST

तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देरवींद्र भोसले : बेलगाव येथे शिबिराचे आयोजन, कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नियोजनास व अंमलबजावणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांची एकत्रितपणे काम करून ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक व अन्य कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले.कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २३ ते २५ ऑगस्टपर्यंत शेतकरी मानधन योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी आनंद पाल, कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी सहाय्यक हेमलता तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सहसंचालक भोसले यांनी अधिकाऱ्यांसह, शेतकऱ्यांना योजनेची यावेळी सविस्तर माहिती देवून शेतकरी माधन योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये असा इशारा दिला.तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार असून वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये (निवृत्ती वेतन) देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नोंदणीसह आवश्यक कागदपत्रेग्रामपंचायतीसह सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन नोंदणी करावी. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले. योजनेत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद देखील या शेतकरी मानधन योजनेत करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना