शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:56 IST

तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देरवींद्र भोसले : बेलगाव येथे शिबिराचे आयोजन, कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नियोजनास व अंमलबजावणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांची एकत्रितपणे काम करून ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक व अन्य कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले.कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २३ ते २५ ऑगस्टपर्यंत शेतकरी मानधन योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी आनंद पाल, कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी सहाय्यक हेमलता तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सहसंचालक भोसले यांनी अधिकाऱ्यांसह, शेतकऱ्यांना योजनेची यावेळी सविस्तर माहिती देवून शेतकरी माधन योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये असा इशारा दिला.तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार असून वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये (निवृत्ती वेतन) देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नोंदणीसह आवश्यक कागदपत्रेग्रामपंचायतीसह सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन नोंदणी करावी. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले. योजनेत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद देखील या शेतकरी मानधन योजनेत करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना