शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:56 IST

तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देरवींद्र भोसले : बेलगाव येथे शिबिराचे आयोजन, कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नियोजनास व अंमलबजावणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांची एकत्रितपणे काम करून ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक व अन्य कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले.कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २३ ते २५ ऑगस्टपर्यंत शेतकरी मानधन योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी आनंद पाल, कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी सहाय्यक हेमलता तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सहसंचालक भोसले यांनी अधिकाऱ्यांसह, शेतकऱ्यांना योजनेची यावेळी सविस्तर माहिती देवून शेतकरी माधन योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये असा इशारा दिला.तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार असून वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये (निवृत्ती वेतन) देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नोंदणीसह आवश्यक कागदपत्रेग्रामपंचायतीसह सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन नोंदणी करावी. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले. योजनेत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद देखील या शेतकरी मानधन योजनेत करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना